एलियन्स म्हणजे गुढ! असं गुढ ज्याची सत्यता आपल्यासारख्या सामान्यांना पडताळता येत नाही. त्यांच्याशी निगडित सिनेमे निघतात. त्यांची चर्चा होते पण सरतेशेवटी ते अस्तित्वात आहेत की नाही ह्याबाबत परत तेवढेच साशंक असतो जेवढे सुरुवातीला असतो. १८ जानेवारी २०१७ रोजी अमेरिकेच्या केंद्रीय अन्वेषण विभाग (CIA) ने काही गुपित कागदपत्रे उलगडली आहेत. त्या कागदपत्रांची संख्या ९,३०,००० आहे. ज्यांच्या द्वारे १९६८ नंतर भारतावरून एकूण सहा वेळेस UFOs दिसल्याचे नमूद केले आहे. ह्याने जगभरात तर खळबळ उडाली आहेच पण भारतातसुद्धा ह्या बातमीची दाखल घेतली गेली आहे. १९६८ साली एप्रिल महिन्याच्या रिपोर्टनुसार – लडाख च्या काही भागावरून एलियन्स ची स्पेसशिप दिसल्याची नोंद आहे. नंतरच्या काही महिन्यात हीच रिपोर्ट सिक्कीम, भूतान आणि नेपाळ च्या भागांमधून आल्याचे सांगितले जाते. आताशा CIA ने एलियन्स चा विषय सोडला आहे (किमान तसं भासवतात तरी!). पण १९५० आणि १९६०च्या दशकात एलियन्स दिसण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. तेव्हा CIA ने ह्याचा धसका घेतला. आणि त्यांच्या विज्ञान विभागातील तज्ज्ञांचे एक Advisory पॅनल बनवले. ज्यांचं काम फक्त ह्या घटनांवर संशोधन करणे हे आहे. CIA च्या ह्या रिपोर्ट चं नाव आहे – Particulars of bright objects seen over south Ladakh, north east Nepal, north Sikkim and western Bhutan. तांत्रिक शब्दांत बघायला गेलं तर रिपोर्ट्स सांगतात, १ मार्च १९६८ रोजी एक वस्तू आकाशात दिसली. पूर्वेकडून पश्चिमेकडे चांग ला, फुकचे ह्या लडाखच्या भागावरून जाताना आढळली. त्या वस्तूची नोंद रिपोर्ट अशी घेते, ''One white light and simultaneously two blasting sounds were heard. Also, one reddish light followed by white smoke'' म्हणजेच, दोन स्फोटांच्या आवाजासोबत एक प्रकाशमान वस्तू दिसली. ती वस्तू मागून एक लालसर लाईट आणि पांढरा धूर सोडून गेली. त्यानंतर UFOs निदर्शनास आले ते २५ मार्च १९६८ रोजी नेपाळ मधल्या कास्की जिल्ह्यातून. बघणाऱ्यांनी वर्णन करताना “तेजस्वी वस्तू, जिच्यातून प्रकाश सारखा लुकलुकत होता” आणि ते पुढे जाऊन “कोसळले.” CIA च्या रिपोर्ट मध्ये “सहा फूट रुंद आणि चार फूट उंच अश्या एका मोठ्या डिश सारख्या धातूच्या बनलेल्या यानाचे तुकडे” बाल्टीचौर पाशी मोठ्या खड्ड्यात सापडले. ह्यासोबतच अजून दोन अशाच घटना घडल्या जिथे UFOs दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. एक ४ मार्च आणि दुसरी २५ मार्च रोजी. लदाख वरून जाणारं हे UFO, रॉकेट सारख्या दिसत आणि त्यामागून १८ मीटर लांब धूसर पिवळी शेपूट सोडत डेमचोक गावाकडे जाताना दिसले. जमिनीपासून जवळपास वीस ते पंचवीस हजार फूट वरून जात असल्याची नोंद रिपोर्ट मध्ये आहे. पुढे १९ फेब्रुवारी १९६८, नेपाळच्या ईशान्येकडे तसेच सिक्कीम च्या उत्तरेकडे ‘a fast-moving and bright object’ दिसल्याची नोंद आहे. रात्री ९ वाजता हे object सिक्कीमच्या लाचुंग, लाचेन, थांगु, मुगुथांग ह्या भागावरून गेलं. विजेच्या कडकडाटासारख्या आवाजासोबत सगळ्या भागाला प्रकाशमान करून गेलं. ह्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी – २१ फेब्रुवारी ला सुद्धा एक वस्तु रात्री ९.३० वाजता भुतान च्या राजधानी, थिंपू वरून जात असताना दिसली. निळसर प्रकाश असलेल्या ज्या UFO सारख्या वस्तूने आवाज ना करता सुसाट वेगाने गेली. तिचा प्रकाश एवढा होता की त्याने भूतानचा सगळा भाग प्रकाशित झाला. CIA ने उघड केलेल्या कागदपत्रांमध्ये पुढे झालेली कारवाई आणि शास्त्रज्ञांनी त्यावरून काढलेले निष्कर्ष अजूनही गुपित ठेवले आहेत. तसेच नेपाळच्या कास्की येथील विवरांमधल्या अवशेषांचं पुढे काय झालं हे सुद्धा अजून गूढ आहे. पुढे मंगळावरील मनुष्य – अंतराळयान ह्यांच्याशी निगडित अनेक अनुमान लावल्या गेले. अंतराळात एलिअन्स असल्याच्या कथा सुद्धा ऐकवल्या जाऊ लागल्या पण त्यांचं खंडन CIA ने १९५२ च्या रिपोर्टमध्ये निष्कर्ष दिला तो असा, ''Even though we might admit that intelligent life may exist elsewhere and that space travel is possible, there is no shred of evidence to support this theory at present.'' म्हणजे अंतराळात आपल्या पेक्षा प्रगत जीवसृष्टी अस्तित्वात आहे. तसेच अंतराळप्रवास शक्य असल्याची पुष्टी देता येईल. पण त्याला आधार द्यायला प्रबळ पुरावा नाहीये. CIA च्या सल्लागार कमिटीने ATIC (Air Technical Intelligence Centre) सोबत काम करताना ह्या सर्व घटनांचा अभ्यास आणि त्यांचा पृथ्वीला असलेला धोका ह्यावर संशोधन केलं. आणि काही मिटींग्स नंतर निष्कर्ष निघाला की, ह्या घटनांचा पृथ्वी आणि रहिवासी ह्यांना प्रत्यक्ष काहीही धोका नाही. पण म्हणजे परग्रहवासियांचं भारतावर जास्त प्रेम आहे, असं का? – नाही! UFOs दिसण्याच्या घटना दक्षिण कोरिया, इरान, मोरोक्को, कझाकिस्तान स्पेन आणि रशिया ह्या देशात सुद्धा झाल्या. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. कोणत्याही देशाची सुरक्षा अबाधित राखण्याचं महत्त्वाचं काम पार पाडतात त्या त्या देशातील इंटलेजीन्स एजन्सी अर्थात गुप्तहेर संस्था! जगातील सर्वच बलाढ्य देशांच्या स्वतः च्या अश्या एकाहून एक सरस गुप्तहेर संस्था आहेत , परंतु या सर्वात वरचढ गुप्तहेर संस्थांपैकी एक म्हणजे मोसाद ! इज्राईल देशाच्या अधिपत्याखाली येणारी ही संस्था जगातील सर्वात क्रूर आणि धाडसी संस्था म्हणून ओळखली जाते. क्रूर यासाठी की या संस्थेतील गुप्तहेर दहशतवादी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जातात. मोसादचा अर्थ आहे मृत्यू ! एखादा गुहेगार यांच्या तावडीत सापडला की त्याचा मृत्यू हा अटळ समजला जातो. जगातील सर्वात खतरनाक अश्या या गुप्तहेर संस्थेला दिलं गेलेलं हे नाव सर्वच अर्थाने योग्य ठरतं. इज्राईल देशाची ही एजन्सी आपल्या नागरिकांच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तब्बल ६८ वर्षांचा इतिहास लाभलेल्या ‘मोसाद’च्या नावावर अतिशय अविश्वसनीय घटनांची नोंद आहे. मोसादच्या गुप्तहेर कथांचे जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत . चला तर जाणून घेऊया ‘मोसाद’बद्दल काही रंजक गोष्टी !
१९६० मध्ये मोसादने अर्जेंटिना मध्ये लपलेला इज्राईलच्या नागरिकांचा गुन्हेगार एडॉल्फ इचमॅन याला शोधून काढले आणि त्याला इज्राईल मध्ये आणून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या कामगिरीमुळे मोसाद जगभरात चर्चेत आलं होतं . |