काश्मीर मध्ये झालेल्या शसाऱ्या हिंसेला २८ वर्ष पूर्ण झाले. या हिंसेने वर्षानुवर्ष चालू असलेल्या सामाजिक ऐक्यालाही भगदाड पडल,काही इस्लामिक कट्टरवाद्यांनी जाणून बुजून तेथील हिंदूंवर अत्याचार केले,हिंदूंचे मंदिरे तोडली,त्यांची घरे जाळली, त्यांच्या बायकांवर बलात्कार केलं.हिंदूंना रात्रीतून घाटी सोडून जायला भाग पडलं. या सर्व परिस्तिथी वर मत करून काश्मीरी हिंदूंनी आज आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, या लेखात जाणून घेऊया अशाच काही सुपर स्टार बदल ज्यांचा देशाला गर्व आहे. १. पंडित जवाहर लाल नेहरू - जवाहर नेहरूंना त्याकाळचे आंतरराष्ट्रीय नेते मानले जायचे,ते स्वरांत्र भारताचे पहिले प्रांतप्रधान होते,पण आपणास माहित आहे का ते एक काश्मिरी पंडित होते आणि त्यांचा जन्म इलाहाबाद मध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्तीत आधुनिक भारताचा पाया भरला,त्यांना पंचशील धोरणाचा निर्माताही मानतात. १९५४ साली त्यांना भारताचा सर्वाष्टया पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आल. २. सुरेश रैना - सुरेश रैना हा मुळचा श्रीनगर मधील रैनवारी येथील पण त्याचे कुटुंब १९८० साली उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे स्थायिक झाले. रैनाचा जन्म येथेच झाला. त्याचे वडील रिटायर आर्मी ऑफिसर आहे. रैना अंडर १९ वर्ल्ड कप की टीम चा हिस्सा होता. १८ वर्षाचा असताने २००५ मध्ये त्याने श्रीलंका विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळाला. आणि टेस्ट कारकीर्ती ची सुरवात २०१० साली झाली. २०११ साली जिंकलेल्या वर्ल्डकप टीमचा रैना सदस्य होता. ३. अभिनेता अनुपम खेर - बॉलिवूड चे लोकप्रिय अभिनेता अमुपम खेर यांची गणती भारताच्या दिग्गज कलारांमध्ये केली जाते. त्यांचा जन्म शिमला येथे झाला. खेर यांचे वडील पुष्कर नाथ एक काश्मिरी पंडित होते. काश्मीर मध्ये होणाऱ्या दैनंदिन हिंसेला वैतागून त्यांनी काश्मीर सोडले. खेर यांनी चित्रपट करियर ची सुरवात 'आगमन' ने केली. त्यांनी खूप साऱ्या गाजलेल्या चित्रपटात काम केलाय,तसेच सामाजिक भान ठेऊन त्यांनी काश्मिरी पंडितांच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाला वाचा फोडलीय. ४. मोहित रैना - टीवी सिरीयल देवों के देव महादेव मध्ये भगवान शिवच पात्र करणारे मोहित रैना ना कश्मीरी पंडित आहे. त्यांचा जन्म जम्मू मध्ये झाला.मोहित मॉडेलिंग सुद्धा करतात, २००५ साली झालेल्या मिस्टर इंडिया मध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी २००४ साली त्यांच्या टीव्ही करिअर ची सुरवात फिक्शन अंतरिक्ष मधून केले होती. २०१३ मध्ये शिवाच्या रोल साठी त्यांना टीव्हीचा बेस्ट ऍक्टर अवॉर्ड भेटला होता. ५. कुणाल खेमू - कुणाल खेमू चा जन्म कश्मीरी पंडिताच्या घरात झाला. त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात बाळ कलाकार म्हणून दूरदर्शन ची सिरीयल 'गुल गुलशन' ने केली होती. त्यांनी ‘राजा हिन्दुस्तानी’,‘हम हैं राही प्यार के’ मध्ये बाळ कलाकार म्हणून काम केलं. त्यांनी २०१५ साली बॉलिवूड एक्टरेस सोहा अली खान सोबत लग्न केलं. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा.
0 Comments
शरद पवार…!महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणातील चाणक्य. एखादी गोष्ट साध्य करायची असेल पण ती सरळ सरळ साध्य होत नसेल – तर कशी साध्य करायची हे पवार साहेबांकडून शिकावं…! साहेबांच्या चातुर्याच्या अनेक सुरस कथा प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक कथा प्रख्यात पत्रकार, कथाकार, नाटककार श्री. गणेश दिघे ह्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकली आहे.दिल्ली प्रशासनाला शरद पवारांनी आपल्या चातुर्याने कसं वाचवलं हे मोठं गमतीशीर रित्या दिसतं. तर घटना अशी :- दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकरराव म्हणाले – छे छे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड नं पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे, त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा…! पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले – जी दहा फुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे, हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल, अन्यथा खूप गैरसोय होईल – हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकूनच घेईनात. बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाहीत, तिथे दुसरं कुणी काही करेल याची काहीच शक्यता नव्हती. तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले. हे ऐकून पवारसाहेब म्हणाले – अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मी ही यात काही करू शकत नाही. उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत. हे बोलून साहेब थांबले नाहीत…!साहेब पुढे म्हणाले :आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. ती अडाणी आहेत. आपण शिकलेली माणसं आहात. तुम्ही झाड जपलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? असे सुनावून, आलेल्यांना चहा पाणी देवून, साहेबांनी कटवले. पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यान देवून ऐकले होते. त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला, त्याला ते रोज पाणी घालू लागले. अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले, पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली. पदाधिकार्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले.=== ह्या कथेत, शरद पवार कोण – झाडाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे खलनायक की पदाधिकार्यांचा खूप मोठा, जटील प्रश्न सोडवणारे चाणाक्ष नायक? निर्णय तुमचा…! AuthorMarathi pizza ArchivesWhatsApp-११४ अब्ज रुपयांच्या कंपनीत किती इंजिनिअर काम करत असतील? – उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल!28/12/2016 WhatsApp – २०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात facebook ने १९ बिलियन डॉलर्स (तेव्हाचे सुमारे ११४ अब्ज रुपये) मोजून विकत घेतलेलीकंपनी. विशेष हे की WhatsApp ही एक तोट्यातील कंपनी होती. तरी फेसबुकने विकत घेतली. फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ! ह्या विकत घेण्याच्या व्यवहारात, WhatsApp च्या दोन्ही फाउंडर्सनी मस्त कमाई केली. Jan Koum ने सुमारे ४० अब्ज रुपये आणि Brian Acton (आधीचा Yahoo! मधला इंजिनिअर) ने सुमारे २१ अब्ज रुपये कमावले. शिवाय Koum फेसबुकच्या बोर्डमधे सामील झाले आणि त्यांची whatsApp मधली CEO ची position सुद्धा कायम राहिली ! |
AuthorGaurav Sarode ArchivesCategories |