बघूया आत्तापर्यंत भाराताच्या लोकशाही सोहळ्याला उपस्तित राहिलेले प्रमुख अतिथी. वर्षमुख्य अतिथि देश पद 2017 शेख मोहमद बिन ज़ायेद अल नाह्यान अबु धाबी क्राउन प्रिंस 2016 फ्रांस्वा ओलांद फ्रांसचे राष्ट्रपति 2015 बराक ओबामा अमेरिका राष्ट्रपति 2014 शिंजो अबे जापान प्रधानमन्त्री 2013 जिग्मे खेसर नामग्यल वांग्चुक भूटान नरेश 2012 यींगलक शिनावात्राथा प्रथम महिला प्रधानमन्त्री 2011 सुसिलो बाम्बांग युधोयोनो इंडोनेशिया राष्ट्रपति 2010 ली म्यूंग बाककोरिया गणराज्य (दक्षिण कोरिया) राष्ट्रपति 2009 नूर सुल्तान नजरबायेब कज़ाख़िस्तान राष्ट्रपति 2008 निकोलस सर्कोजी फ्रांस राष्ट्रपति 2007 व्लादिमीर पुतिन रूस राष्ट्रपति 2006 अब्दुल्ला बिन अब्दुल अज़ीज़ अल-सऊद सउदी अरब शाह 2005 वांगचुक भूटान नरेश 2004 लुईज़ इनासियो लूला द सिल्वा ब्राज़ील राष्ट्रपति 2003 मोहम्मद ख़ातमी ईरान राष्ट्रपति 2002 कसाम उतीम मॉरीशस राष्ट्रपति 2001 अब्देलाज़िज बुटेफ्लिका अलजीरीया राष्ट्रपति 2000 ओलूसेगुन ओबाझाँजो नाइजीरिया राष्ट्रपति 1999 बिरेन्द्र बीर बिक्रम शाह देवनेपाल नरेश 1998 जैक्स चिराक फ्रांस राष्ट्रपति 1997 बासदियो पांडेयत्रिनिनाड टोबैगो प्रधानमंत्री 1996 डॉ. फरनॉनडो हेनरिक कारडोसो ब्राजील राष्ट्रपति 1995 नेल्सन मंडेलादक्षिण अफ़्रीका राष्ट्रपति 1994 गोह चोक टोंग सिंगापुर प्रधानमंत्री 1993 जॉन मेजर ब्रिटेन प्रधानमंत्री 1992 मारियो सोर्स पुर्तगाल राष्ट्रपति 1991 मौमून अब्दुल गयूम मालदीव राष्ट्रपति 1990 अनिरुद्ध जुगनौत मॉरीशस प्रधानमंत्री 1989 गुयेन वैन लिंह वियतनाम प्रधान सचिव 1988 जुनियस जयवर्द्धने श्रीलंका प्रधानमंत्री 1987 ऐलेन गार्सिया पेरु प्रधानमंत्री 1986 एँड्रियास पपनड्रीयु ग्रीस प्रधानमंत्री 1985 रॉल अलफोन्सिन अर्जेन्टीना राष्ट्रपति 1984 जिग्मे सिंघे वाँगचुक भूटान नरेश 1983 सेहु शगारी नाइजीरिया राष्ट्रपति 1982 जॉन कार्लोस प्रथम स्पेन राष्ट्रपति 1981 जोस लोपेज़ पोरेटील्लो मेक्सिको राष्ट्रपति 1980 वलेरी गिस्कार्ड द इस्टेइंग फ्रांस राष्ट्रपति 1979 मलकोल्म फ्रेज़र ऑस्ट्रेलिया प्रधानमंत्री 1978 पैट्रीक हिलेरी ऑयरलैंड राष्ट्रपति 1977 एडवर्ड गिरेक पौलैण्ड प्रथम सचिव 1976 जैक्स चिराक फ्रांस प्रधानमंत्री 1975 केनेथ कौंडा जांबिया राष्ट्रपति 1974 सिरीमावो रतवत्ते दियास बंदरनायके यूगोस्लाविया राष्ट्रपति 1973 मोबुतु सेस सीकोजैरे राष्ट्रपति 1972 सीवुसागर रामगुलाम मॉरीशस प्रधानमंत्री 1971 जुलियस नीयरेरे तंजानिया राष्ट्रपति 1970 - - 1969 टोडर ज़िकोव बुल्गारिया प्रधानमंत्री 1968जोसिप ब्रोज टीटो एवं एलेक्सी कोज़ीगिनराष्ट्रपति यूगोस्लाविया, प्रधानमंत्री सोवियत यूनियन 1967 - - 1966 - - 1965 राना अब्दुल हामिद पाकिस्तान खाद्य एवं कृषि मंत्री 1964 - - 1963 नोरोदम शिनौक कंबोडिया राजा 1962-- 1961 एलिज़ाबेथ द्वितीय ब्रिटेन रानी, 1960 क्लिमेंट वोरोशिलोव सोवियत संघ राष्ट्रपति 1959 - - 1958 मार्शल यि जियानयिंग चीन 1957 - - 1956 - - 1955 मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तान गर्वनर जनरल 1954 जिग्मे दोरजी वाँगचुक भूटान नरेश 1953-- 1952-- 1952-- 1950 सुकर्णो इंडोनेशिया राष्ट्रपति आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. आजपर्यंतचा सर्वात क्रूर हुकूमशहा म्हटलं कि आपल्यासमोर येतो तो एडॉल्फ हिटलर, पण जरा थांबा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अश्या हुकूमशहा बद्दल ज्याच्या क्रूरतेसमोर हिटलर चा कुठेच निभाव नाही लागत,त्याचा नाव आहे ईदी अमीन, तो युगांडा चा हुकूमशहा होता. त्याच्या भयावह दहशतीमुळे जग त्याला ‘मैड मैन ऑफ अफ्रीका’ या नावानेही ओळखायचं. अमीन चा जन्म 1925 साली कोबोको मध्ये झाला. ईदी अमीन १९७१ ते १९७९ सैन्य नेता व राष्ट्रपति होता. अमीन १९४६ मध्ये एक सहाय्यक स्वयंपाकी म्हणून अस्थायी ब्रिटिश औपनिवेशिक सेनेच्या किंग्स अफ्रीकन राइफल्स मध्ये सहभागी झाला होता. लवकरच त्याला मेजर जनरल पदापर्यंत बढती भेटली, १९७१ साली बंड करून मिल्टन ओबोटे ला राष्ट्रपति पदावरून हटवून अमीन स्वतः युगांडा चा राष्ट्रपति झाला. त्याने स्वतःला सगळ्या सशस्त्र बळाचा प्रमुख कमांडर, आर्मी चीफ ऑफ स्टाफ और चीफ ऑफ एयर स्टाफ घोषित केलं. हे सर्व करत असताने त्याने लीबिया चे प्रमुख मुअम्मर अल-गद्दाफी व सोवियत संघ आणि पूर्वी जर्मनीचा समर्थन मिळवलं. राष्ट्रपति असताने त्याने लोकांवर खूप जुलूम केले, लांगो आणि अछोली जातीच्या जवळपास ५ लाख लोकांची त्याने कत्तल केली. ईदी ची शिक्षा द्यायची पद्धत पण खूप क्रूर होती,तो लोकांना फाशी किंवा गोळी मारायची शिक्षा देत नव्हता तर तो लोकांना जिवंत जमिनीत दफन करायचा किंवा उपाशी मगरींपुढे फेकून द्यायचा. ईदीने त्याच्या महालातील सर्व सुंदर महिलावर अत्याचार केले त्याला विरोध करणाऱ्या सर्वाना जीवाला मुकावे लागले, तो माणसांचे मांस खाण्याचाही शौकीन होता,तो आपल्या फ्रिज मध्ये मारलेल्या माणसांचे कापलेले डोके ठेवायचा. १९७९ मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेनी अमीनची हुकूमशाही जडापासून उखडून फेकली. त्याच्यानंतर अमीनला देश सोडून पाळावा लागलं. त्यानंतर त्याने काही दिवस लिबिया आणि नंतर साऊदी अरब मध्ये शरण घेतली, तिथेच तो १६ ऑगस्ट २००३ रोजी मरण पावला. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. वास्को-द-गामा म्हणजे जगाच्या सफारीसाठी निघालेला एक महत्त्वाकांक्षी दर्यावदी! भारताच्या भूमीवर पाउल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. जगाच्या सफरीसाठी निघालेल्या या खलाश्याचा संपूर्ण प्रवास अगदी रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. अश्या या बिनधास्त दर्यावर्दीचं ५०० वर्षांपूर्वी एक जहाज समुद्रात बुडालं होतं आणि आता त्या जहाजाचा शोध लागला आहे. १५०३ साली दुसऱ्या भारत दौऱ्यामध्ये वास्को द गामाच्या काकांनी वास्को द गामा जवळील एक जहाज सफारीसाठी बाहेर काढलं. पुढे मी महिन्यामध्ये हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेमध्ये विसेन्ट सॉडरस या जहाजाच्या कमांडरसह जहाजावरील सर्वांचाच बुडून मृत्यू झाला होता. सुमारे ५०० वर्षांपूर्वी बुडालेल्या याच जहाजाचे अवशेष अखेर ओमानच्या समुद्रामध्ये सापडले असून ते वास्को द गामाचंच जहाज असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. १४९९ मध्ये वास्को द गामाच्या च्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे. या जहाजाच्या शोधामुळे एक ऐतिहासिक ठेवा जगाच्या हाती लागला आहे. या जहाच्या संशोधनातून इतिहासातील काही नवीन रहस्ये उलगडतील आणि नवीन गोष्टी जगासमोर येतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा. दहशतवाद हे मानवी राक्षसाचे आधुनिक रूप! गेल्या काही वर्षांत हा राक्षस अधिकच बोकाळला आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर येणारे युग हे अतिशय भयंकर असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असेल की दहशतवादामध्ये केवळ पुरुषांचा सहभाग असतो तर तुमचा हा समज पूर्णत चुकीचा आहे. कारण जगातील सर्वच दहशतवादी संघटनांमध्ये महिला देखील तितक्याच सक्रीय आहेत जेवढे की पुरुष सक्रीय आहेत. गेल्या काही वर्षातील दहशतवादी हल्ल्यांमधून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे की दहशतवादी संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वेगाने वाढतो आहे. जगातील काही खतरनाक दहशतवादी संघटनांमधील महिला देखील इतक्या खतरनाक आहेत की गुप्तहेर यंत्रणा हात धुवून त्यांच्या मागे लागल्या आहेत आणि त्यांनी या महिलांना मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे. हिटलिस्ट मधील बऱ्याचश्या महिला दहशतवाद्यांना जरी कंठस्नान घालण्यात या गुप्तहेर यंत्रणांना यश आले असले तरी बऱ्याचश्या धोकादायक महिला आजही मोकाट आहेत. चला जाणून घेऊया त्यापैकी चार मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांबद्दल! हसना अत बोलाचेन फ्रान्समधील पॅरिस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली हसना ही युरोपमधील पहिला महिला दहशतवादी असल्याचेही म्हटलं जात आहे. पॅरिस हल्ल्याच्या तपासादरम्यान, जेव्हा पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्या छापा टाकला, त्यावेळी तिथे हसना हजर होती. मात्र, तिने पोलिसांना शरण जाण्याऐवजी स्वत:लाच बंदुकीनं उडवलं. हसनाने स्वत:ला गोळी मारल्याच्या वृत्ताचं फ्रान्स पोलिसांनी खंडण केलं आहे. हसनाचं लहनापण प्रचंड वेदनादायी होतं. मात्र, तिला ओळखणाऱ्या कुणालाही असं वाटत नव्हतं की, हसना दहशतावाद किंवा कट्टरतावादकडे झुकेल. हसनाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, तिने कधीच कुराण उघडून पाहिलं नाही. मात्र, ती नेहमी फेसबुक आणि व्हॉट्सअप बघायची. असाता शकुर क्युबामध्ये राहणारी असाता ही अनेक दहशतवादी कार्यांमध्ये सक्रीय आहे. १९७१ ते १९७३ या तीन वर्षांच्या कालावधीत असाता अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे. १९७९ मध्ये एका बँक दरोडा आणि एका पोलिसाची हत्या या गुन्ह्यांमध्ये असाता शिक्षा भोगत असताना अमेरिकेतून क्युबामध्ये पळून आली. गेल्या ३० वर्षांपासून असातावर मोठ-मोठे बक्षीस जाहीर झाले आहेत. समांथा ल्यूथवेट व्हाईट विडो या नावाने ओळखली जाणारी ब्रिटनची नागरिक समांथाला अनेक देशांचे पोलीस शोधत आहेत. समांथा प्रचंड खतरनाक महिला दहशतवादी म्हणून ओळखली जाते. ७ जुलै २००५ मधील लंडनमधील एका सार्वजनिक बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात समांथासह तिचा पती जर्मेन लिंडेसचाही सहभाग होता. २०१३ साली नायोरबीमधील शॉपिंग मॉलमधील हल्ल्यामागेही समांथाचा हात होता, असे म्हटले जात आहे. या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महिलांना सुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देण्याचा आरोपही समांथावर आहे. तशफीन मलिक ३१ वर्षीय तशफीन मलिक हिने तिचा पती सय्यद फारुख याच्यासोबतीने कॅलिफोर्नियातील एका कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार करुन १४ लोकांची हत्या केली. असे म्हटलं जातं की, तशफीन ही कॉलेजमध्ये सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखी जायची. मात्र, याची कुठेही माहिती मिळत नाही, की तशफीन कट्टरतावादाकडे कशी आणि केव्हा झुकली. तशफीन आणि फारुख या दहशतवादी दाम्पत्याला एक सहा महिन्यांची मुलगी आहे, या मुलीला त्यांनी फारुखच्या आईकडे सोडलं आहे. दहशतवादाचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी असे सांगितलं आहे की, मुल जन्माला घालणं हे या दहशतवादी दाम्पत्याची रणनिती असण्याची शक्यता आहे. मुल आहे म्हणजे तशफीन आणि फारुख हे सर्वसामान्य दाम्पत्य आहे, असा समज निर्माण व्हावा यासाठी या दोघांनी मुल जन्माला घातलं असावं, असाही जाणकारांचे म्हणणे आहे. दहशतवादासारख्या हीन कृत्यांमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही फारच चिंतेची बाब आहे. यासाठी संपूर्ण जगभर वेळीच समाज प्रबोधन केले तर कदाचित भविष्यात महिला दहशतवादी बनण्यापेक्षा त्या विरोधात लढण्यासाठी उभ्या राहतील. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी क्लिक करा. वार्ताहराने कसे असायला हवे, याचे विसाव्या शतकातील एक ठसठशीत आदर्श ठरणारे उदाहरण म्हणजे क्लेअर हॉलिंगवर्थ. सन १९३९च्या ऑगस्टमध्ये नुकतीच ‘द टेलिग्राफ’ या दैनिकात नोकरीस लागलेली सुमारे २७ वर्षांची तरुणी पोलंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, तिथे जाता येत नाही म्हणून थेट ब्रिटिश वाणिज्यदूताची मोटारगाडी मिळवते आणि जर्मनव्याप्त पोलिश भूमीत शिरून शंभरावर रणगाडे पाहाते.. काय होणार आहे याचा तिला अंदाज येतो, कॅमेरा नसल्याने ती रणगाडय़ांचेच जमिनीवर पडलेले भाग जमवते आणि बातमी देते : जर्मनी मोठय़ा आक्रमणाच्या तयारीत! ‘सनसनाटी’ म्हणून वार्ताहरांच्या कष्टांना हिणवण्याची रीत तेव्हाही होती, पण तेव्हाचीही वृत्तपत्रे अशा लोकभावनेपेक्षा वार्ताहरांवरच विश्वास ठेवत, म्हणून घडत्या इतिहासाची ही पहिली खूण तातडीने ब्रिटिशांपर्यंत पोहोचू शकली. ही बातमी अर्थातच खरी ठरली, तेव्हा क्लेअर हॉलिंगवर्थ मात्र जर्मनव्याप्त ऑस्ट्रियात अडकल्या होत्या. ही एवढी एकच बातमी देऊन जरी त्या १०५ वर्षे जगल्या असत्या, मग १० जानेवारीच्या मंगळवारी हाँगकाँगहून त्यांची निधनवार्ता आली असती.. तरीही पत्रकारितेवर प्रेम करणारे हळहळलेच असते. निधनवार्ता आली, पण क्लेअर हॉलिंगवर्थ यांनी केवळ त्या एका बातमीपुरते काम केले नव्हते.. त्यांचे काम इतके की, जगाने त्यांच्या कर्तृत्वाकडे मागे वळून पाहाताना अचंबित व्हावे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्या बुखारेस्टला होत्या. सर्वच पत्रकारांवर र्निबध होते. ते डावलून ब्रिटनला बातम्या पाठवणे क्लेअर यांनी आरंभले. सुगावा लागून हंगेरीचे पोलीस अटकेसाठी आल्यावर हिने काही चपळ कृती केल्या आणि म्हणाली : मी विवस्त्र आहे, तुम्ही मला अटक करूच शकत नाही. अखेर पोलिसांनी ब्लँकेट टाकून क्लेअर यांना ताब्यात घेतले खरे, पण या अटकेनंतर ‘अटकेलाही घाबरायचे नाही’ हेच क्लेअर शिकल्या! युद्ध संपल्यावर आधी जेरुसलेमला, मग कैरोत आणि अखेर फ्रान्सला, पॅरिस शहरातच त्यांना पाठवण्यात आले, तर तिथून त्या सारख्या अल्जेरियात जाऊ लागल्या.. फ्रान्सशी त्या देशाचा स्वातंत्र्यलढा ऐन हिंसेच्या भरात असताना, अल्जेरियाच्या केवळ राजधानीत नव्हे तर लहान गावांमध्ये फिरून फ्रान्सची दडपशाही कशी सर्वदूर आहे, याचे वृत्तान्त देऊ लागल्या. ‘स्वस्थ बसायचे नाहीच’ हे वार्ताहराचे ब्रीद त्या जगत होत्या. ब्रिटिश शासकांच्या मर्जीबाहेर काम न केल्याचा संशय त्यांच्या इथवरच्या कारकीर्दीवर घेतला जाऊ शकला असता, ती शक्यताही क्लेअर यांच्या एका बातमीमुळे धुडकावली गेली. ब्रिटिश हेर किम फिल्बी हे क्लेअर यांच्या परिचयाचे; पण ‘फिल्बी बहुधा केजीबीसाठीही छुपेपणाने काम करीत असावेत’ ही शंका पहिल्यांदा बातमीद्वारे नोंदवली ती क्लेअर यांनीच. तिचा इन्कार तत्कालीन पंतप्रधानांनी केला. पण अखेर अनेकांच्या पाठपुराव्यानंतर, बातमी खरी ठरली व फिल्बींना कबुली द्यावी लागली. एखादी विशिष्ट श्रेणी मानून त्या श्रेणीत आलेली ‘पहिली महिला’ वगैरे बिरुदे क्लेअर यांना मिळत होतीच, पण महिला असण्याचे त्यांना काही विशेष वाटत नसे. ‘फ्रंट लाइन’ हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले. उत्तरायुष्यात – म्हणजे नव्वदीपार गेल्यानंतर – त्या हाँगकाँगमध्ये राहू लागल्या होत्या.. हाँगकाँगमधील इंग्रजी भाषकांचे प्रेम त्यांना लाभले, फेसबुकवर क्लेअर हॉलिंगवर्थ चाहतेमंडळ स्थापन झाले, या मंडळातर्फे गेल्याच १० ऑक्टोबरला त्यांचा १०५वा वाढदिवस साजरा झाला होता. जिवंतपणी मानवी मर्यादा ओलांडणाऱ्या, इतिहासाच्या ठसठसत्या नसांवर अचूक बोट ठेवणाऱ्या या पत्रकाराने मृत्यूचीही ‘डेडलाइन’ जणू थोपवून ठेवली होती.. अखेर ही डेडलाइन त्यांना पाळावी लागली. Click here to like our Facebook page. जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक पराक्रमी कुलदीपक जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द पाहणे माउली सईबाईंच्या नशिबी नव्हतेच मुळी! युवराज संभाजी अवघे २ वर्षांचे असताना त्यांनी कैलासाची वाट धरली. जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली युवराज संभाजी तयार होत होते. आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरवपताका यशस्वीपणे पुढे न्यावी या हेतूने युवराज संभाजी लहान असल्यापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून त्यांना घडवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले की सोबत संभाजी राजांना आवर्जून नेत असतं. तसेच स्वत:हून सैन्याची लहानगी तुकडी पाठवून संभाजी राजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगतं. शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते. त्याच दरम्यान संभाजी राजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण! महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचे आमंत्रण स्वीकारले. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले. तेव्हा औरंगजेबाला वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपल्याले जगणे असह्य करणार आहे. आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजी राजांना अनेक गोष्टी शिकता आल्या. पुढे आग्र्यातून निसटणे, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणे, नानाविविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले. १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ऍबे कँरे नामक एका फ्रेंच प्रवाश्याने संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन त्यांच्यातील कुशल राज्यकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांची मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वत:ला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. आता ते स्वत: छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल रयतेमध्ये पसरलेले गैरसमज दूर करून आपण देखील आपल्या पित्याप्रमाणे स्वराज्य अजून १०० वर्षे पुढे नेऊ शकतो हे त्यांना सिद्ध करायचे होते. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले. संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा ९ वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे. केवळ २३ वर्षांचे संभाजी महाराज औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजंकडे होती महत्त्वकांक्षा! याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना पळो की सळो करून सोडले होते. गोव्यातील पोर्तुगीजां विरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वत:हून खाडीमध्ये उतरुन त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले. कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी रयतेला आपलेसे केले. प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती. लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापाला होता. संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले? ‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले. विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य! पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता, त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी! औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्याच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले. केवळ ३२ वर्षांचा त्यांचा हा जीवनप्रवास जगातील इतर जगज्जेत्यांसमोरही फिका वाटावा असाच आहे!! “संभाजी महाराजांनी काय केले?” असा प्रश्न जे विचारतात – खास त्यांच्यासाठी पुढील माहिती – संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले. स्वराज्यात चार नवीन किल्ल्यांची भर घातली. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला. युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारूगोळा कारखाना सुरु केला. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बाल मजुरी व बेटबिगारी विरूध्द कायदे तयार केले. संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले होते की त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही. संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही…! त्यांनी सामारे २७ वर्षे औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवले त्यामुळे उत्तरेकडे औरंगजेबाचे दुर्लक्ष झाले आणि तेथे इतर हिंदू सत्ता उदयास आल्या आणि उत्तरेतील हिंदू धर्म तरला. त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळले नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरवपताका फडकावली. संभाजी राजांच्या काळात स्वराज्य अधिक सुरक्षित राहील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून दाखवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा तो शब्दन शब्द खरा करून दाखवला. अवघ्या ९ वर्षांच्या कार्यकाळात एकही तह नाही की १२८ लढायांमध्ये एकही हार नाही अश्या या धर्माच्या अभिमानी, स्वराज्याच्या संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ! ३ मार्च १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांना उत्तरेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी चालून आली. १७५० च्या दशकामध्ये मराठ्यांनी उत्तरेकडील भागात अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यांनी थेट ‘अटके’पार मराठा साम्राज्य वाढविले. थोरले बाजीरावांची कारकीर्द संपेपर्यंत मराठ्यांनी एव्हाना भारतीय सीमा ओलांडत त्या पलीकडील इस्लामी राजवटींना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती. हे पाहून मराठ्यांचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे असे या राजवटींना वाटू लागले. १७५८ साली दिल्ली काबीज करत मराठ्यांनी अप्रत्यक्षरित्या अखंड भारत आपल्या कवेत घेतला. पंजाब आणि आसपासच्या प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या तिमूर शहा दुराणी याला देखील मराठ्यांनी पळवून लावले. हा तिमूर शहा दुराणी म्हणजे अहमदश अब्दालीचा थोरला पुत्र होय. ही घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरील संकट मानून चवताळलेल्या अब्दालीने आपल्या १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशाह अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता. याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून १ लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले. या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट येऊन मिळाल्याने मराठ्यांची ताकद शंभर पटींनी वाढली. या युतीने सर्वप्रथम दिल्लीवर आक्रमण केले. विश्वासरावांना दिल्लीच्या गादीवर बसवण्याचा भाऊंचा इरादा होता. पुरेशी रसद नसल्यामुळे त्यांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला आणि येथे अघटीत घडले. जाट आणि शिखांनी भाऊंचा हा देश अमान्य करीत आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात. अब्दाली आणि मराठ्यांमध्ये बारीक सारीक लढाया सुरु होत्या. कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी अब्दालीची बरीच सेना कापून काढली आणि उर्वरित सेनेला बंदी म्हणून ताब्यात घेतले. यामुळे चिडलेल्या अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली. अब्दालीने यमुना ओलंडताच मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला. पानिपत आणि सोनपत मधील संबलका येथे अब्दाली पोचताच मराठ्यांनी त्वेषाने अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविला पण इतक्यात अब्दालीची उर्वरित सेना दाखल झाली आणि मराठ्यांची ताकद कमी पडली. दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. या छोट्याश्या लढाईमध्ये अब्दालीला मराठ्यांची आणि मराठ्यांना अब्दालीची कुवत कळली. पण अब्दाली स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. त्याने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मरठी सैन्याची उपासमार होऊ लागली. पुढे दोन महिने दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करतच होते. पण अजूनही मोठ्या युद्धाला सुरुवात झाली नव्हती. दिवस सरत होते आणि मराठी सैन्यसही अन्न अपुरे पडू लागले. यावर उपाय म्हणून मराठ्यांनी स्थानिकांवर हल्ले करण्यास आणि लुटमार करण्यास सुरुवात केली. या पवित्र्यामुळे स्थानिकांचा मराठी फौजांवरचा रोष वाढीस लागला. इतक्या वेळ स्वस्थ बसलेल्या भाऊंनी अखेर स्वतहून पहिले पाउल उचलले. अन्नसाठा देखील जवळपास संपला होता. आता युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे प्रथम चालून गेला इब्राहीम खान! त्याने मराठ्यांच्या साथीने अफगाण आणि रोहिल्यांना सळो की पळो करून सोडले. भाऊंनी मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली. बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. त्यांनी अब्दालीची सेना पार धुळीला मिळवली होती. येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले. ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले. भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या. पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आहे. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली. जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली आणि यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही. कारण यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली. मुघल सत्ता तर आधीच खिळखिळी झाली होती आणि आता तर एकमेव मराठे साम्राज्य देखील घायाळ वाघाप्रमाणे निपचित पडून असल्याचे पाहून इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि १४ जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावत आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही. खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे, दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य! मराठा सैन्याने आपल्या मातीपासून १२००-१४०० किमी दूर अंतरावर जाऊन परकीयांविरोधात तेवढाच निकराने लढा दिला जेवढा त्यांनी इतर लढायांमध्ये दिला होता. पानिपताच्या रणांगणावर जर मराठा झेंडा रोवला गेला असता तर पुढचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी किती गौरवशाली असता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. लेखक अर्नाल्ड फ्लेचर हे त्यांच्या “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉनक्वेस्ट” या पुस्तकात म्हणतात, पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता. परंतु जणू कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि नशिबही! पण या पानिपताच्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे अहमदशाह अब्दालीला देखील मराठा साम्राज्याविरोधात जाणे चांगलेच महाग पडले होते, त्यामुळे पुन्हा कधीही अब्दालीने किंवा वायव्येकडील कोणत्याही साम्राज्याने भारतावर आक्रमण केले नाही. म्हणजे मराठी जरी पानिपतामध्ये हरले असले तरी त्यांनी मरता मरता त्यांनी जे शौर्य दाखवले त्याचे चीज झाले असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात, कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती ! तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !! मराठ्यांच्या हिंमतीला एवढीच दाद देऊन चालणार नाही कारण युद्ध हरल्यावर बरचसे सैन्य जरी माघारी परतले असले तरी त्याहूनही जास्त सैन्य पानिपतामध्येच राहिले आणि आज पानिपत त्यांची कर्मभूमी झाली आहे. त्यांच्या वंशजांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते. आज २५० वर्षानंतरही ज्या भूमीत त्यांच्या पूर्वजांनी गुडघे टेकले त्याच भूमीत हे रोड मराठा समाजाचे आपले बांधव मराठी झेंडा अभिमानाने रोवून आपली छाप पडत आहेत आणि आजही पानिपतातील मराठी सैन्याच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवून आहेत. हे देखील वाचा : मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज ! राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली. जगाच्या इतिहासामध्ये स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल चला काही रंजक गोष्टी जाणून घेऊया! १३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! पण त्यांनी आपलं शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केलं.राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. या मोहिमेत त्यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी संशोधन केले. अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की अंतराळातून आपलं भारत कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मा म्हणाले, सारे जहॉं से अच्छा! त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. Click here to like our facebook Page तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल आणि प्राचीन काळातील राजे-राजवटींच्या काळातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चीन सारखा दुसरा इतिहास नाही. चीनचा इतिहास हा इतक्या विचित्र आणि विक्षिप्त गोष्टींनी भरलेला आहे की वाचताना चेहऱ्यावर केवळ कुतुहलाचेच भाव असतात. चीनच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलंय. त्यांची स्वत:ची अशी एक ओळख आहे. काही राजे शूर होते, काही प्रेमळ होते तर काही अगदीच वेडे आणि विक्षिप्त होते. चीनच्या इतिहासामधील असाच एक ठार वेडा सम्राट म्हणजे चीनचा सम्राट झेंगडे होय! सम्राट झेंगडे याचे मूळ नाव होते झु होझाओ! २६ ऑक्टोंबर १४९१ रोजी प्रसिद्ध मिंग साम्राज्यात त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांची संपूर्ण चीन साम्राज्यावर सत्ता होती. स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण चीन आपल्या कवेत घेतला होता. अश्या या शूर राज्याचा अकस्मात मृत्यू झाला आणि अवघ्या १४ वर्षांचा त्याचा मुलगा झु हा गादीवर बसला आणि चीनचा सम्राट झाला. झु हा काही लहानपणापासून विक्षिप्त नव्हता. तो सर्वच बाबतीत हुशार होता. विशेष करून धर्मशास्त्रामध्ये तो पारंगत होता. पण सत्त्तेची धुंदी भल्याभल्या विद्वानांना नादी लावते आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट करते हे काही उगाचचं म्हटले जात नाही. झु सोबत देखील तसेच काहीसे झाले. मदिरा आणी मदिराक्षी यांच्या सहवासात तो स्वत:चे सम्राटपद विसरून गेला. जनानखाण्यात त्याने इतक्या वेश्या ठेवल्या होत्या की हळूहळू जागा अपुरी पडू लागली. त्याला प्रत्येकीकडे जातीने लक्ष देता येईना. त्यामुळे अनेक जणींची उपासमार व्हायची. त्यामुळे काही जणींना मृत्यूने गाठले. एकदा तर जनानखान्याला भलीमोठी आग लागली. अनेक स्त्रिया त्यात गुदमरून मृत पावल्या. ही आग सम्राज्ञीच्या आदेशावरून लावली गेल्याचे बोलले जाते. परंतु सम्राट झेंगडेला या गोष्टींची काहीही फिकीर नव्हती. सम्राट झेंगडे हा जनानखान्यातून क्वचितच बाहेर यायचा. त्याचा दरबार हा जनानखान्यातच भरला जायचा असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तेथूनच तो प्रजेबद्दलचे आणि राज्याबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा. निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करण्याच्या भानगडीत तो कधीही पडायचा नाही. कोणताही प्रश्न सेकंदात सोडवायचा आणि त्यावर निर्णय देण्यात त्याचा हातखंडा होता. अर्थातच बहुतांश निर्णयाचा त्याला फटका बसला परंतु काही निर्णय मात्र त्याच्या चांगलेच पथ्थावर पडले. सम्राट झेंगडे ला शिकारीचा देखील नाद होता. पण शिकार करण्यासाठी जंगलात जाणे त्याला कंटाळवाणे वाटे, म्हणून त्याने राजमहालातच अनेक श्वापदे आणून ठेवली होती. लहर आली की तो त्यांना पिंजऱ्याबाहेर सोडण्याचे आदेश द्यायचा आणि त्यांचा जीव घेऊन शिकार केल्याचा आनंद मिळवायचा. सम्राट झेंगडेच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नव्हतं. अचानक या सम्राटाला हिजड्यांबद्दल कळवला वाटू लागला. चीनमधीलच नाही तर विदेशातील हिजड्यांना देखील आपल्या साम्राज्यात येण्याचे आमंत्रण त्याने पाठवले आणि त्यांची एक फौज बनवून त्यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले. त्याने आठ हिजड्यांची निवड केली आणि त्यांची एक सल्लागार समिती स्थापन केली. या आठ हिजड्यांना ‘एट टायगर्स’ म्हटले जायचे. त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे तो पालन करायचा. सम्राटाने त्यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल केला होता. या अधिकाराचा एट टायगर्सने बराच गैरफायदा घेतला, या गटाचा प्रमुख होता ‘लिऊ जीन’! सम्राट झेंगडेच्या अतिशय मर्जीतला माणूस म्हणून सगळे त्यांना घाबरून असायचे. हा लिऊ जीन वाटायचा तितका साधा नव्हता. सम्राट झेंगडेची हत्या करून आपल्या भावाच्या नातवाला गादीवर बसवायचे आणि संपूर्ण राज्य आपल्या हाती घ्यायचे असा कट त्याने रचला. पण एट टायगर्स पैकी कोणा एकाला लिऊ जीनचे हे कट कारस्थान कळले आणि त्याने थेट सम्राट झेंगडेला या कटाबद्दल सांगितले. हे ऐकून सम्राट झेंगडेची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने लिऊ जीनची चौकशी करण्याचे आदेश दिले. लिऊ जीनने घाबरून आपला गुन्हा कबूल केला. अर्थातच सम्राट झेंगडे हा काही मृदु मनाचा नव्हता, त्याने लिऊ जीनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. १५१० साली लिऊ जीनला प्रजेसमोर ठार मारण्यात आले. या घटनेनंतर तरी सम्राट झेंगडे सुधारेल अशी दरबारातील काही एकनिष्ठ लोकांना आशा होती. परंतु सम्राट झेंगडेचे स्वभावात काहीही बदल झाला नाही. त्याने विनाकारण सभोवतालच्या राज्यांववर आक्रमणे केली. सम्राट झेंगडेच्या या स्वभावामुळे त्याच्याबद्दल इतर साम्राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजा देखील सम्राटाच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळली होती. अनागोंदीच्या या वातावरणाचा हिजड्यांच्या फौजांनी बराच फायदा घेतला. त्यांनी सम्राट झेंगडेचे साम्राज्य अगदी धुळीला मिळवून टाकले. मिंग साम्राज्य अस्ताच्या उंबरठ्यावर उभे होते. अचानक २० एप्रिल १५२१ रोजी सम्राट झेंगडे नाहीसा झाला. सगळीकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा महाला जवळच्या एका तलावात त्याचे मृत शरीर आढळले. सम्राट झेंगडेची हत्या कोणी केली याचे सत्य शेवटपर्यंत गुलदस्त्यातचं राहिले. त्याच्या विश्वासातल्या हिजड्यांनीचं संपत्तीच्या लोभापायी त्याचा काटा काढला अशी कुजबुज सुरु होती. परंतु ठोस असे काही निष्पन्न होऊ शकले नाही. टायटॅनिक म्हटलं की आठवतं ते भलंमोठं प्रचंड जहाज आणि त्या जहाजाच्या अपघातावर आधारित चित्रपट! या चित्रपटामध्ये टायटॅनिकला नेमका अपघात कसा झाला आणि ते जहाज बुडालं कसं यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुळात तुम्हाला हे सर्व माहित असणारच, कारण टायटॅनिक चित्रपट न पाहण्रा माणूस मिळणे तसं कठीणच! तरी ज्यांनी पहिला नसेल त्यांना म्हणून सांगतो, जहाजाच्या भल्यामोठ्या आकारापुढे जशी मुंगी भासावी तश्या समुद्रातील लहानग्या हिमानागाला धडकल्यामुळे टायटॅनिक बुडलं! हे असंच संपूर्ण जगात मानलं जातं. पण ज्याप्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक गोष्टींमध्ये वेगळ्या बाजूने तर्क लावणारा एक गट असतो तसाच एक गट टायटॅनिक जहाजाच्या या अपघात कहाणीला नाकारतो आणि वेगळा अर्थ लावतो. आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी हा गट त्यावर रिसर्च देखील करत होता आणि त्यातून त्यांना सापडलेला निष्कर्ष असे दर्शवतो की आपण आजवर जे हिमनगाचं कारण ऐकत आलोय ते अर्धसत्य आहे…! एप्रिल १९१२ रोजी एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना झालेल्या टायटॅनिकला जहाजाला अटलांटिक महासागरामध्येच जलसमाधी मिळाली होती. या ऐतिहासिक दुर्घटनेत १५०० पेक्षा जास्त लोकांना स्वत:चे प्राण गमवावे लागले होते. आगीमुळे जहाजाला नुकसान पोहोचलं त्यानंतर ते हिमनगाला ठोकल्यामुळे ते अजून कमजोर होऊन बुडालं. टायटॅनिकच्या अपघातावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार, टायटॅनिकमध्ये सर्वात प्रथम मागच्या बाजूला आग लागली होती. त्यामुळे ते जहाज कमजोर झाले होते. सुमारे तीन आठवड्यापर्यंत ही आग धुमसत होती. यावर कोणी लक्ष दिलं नाही. जहाजाच्या जा भागात आग लागली होती. तीच कमजोर बाजू हिमनगाला ठोकली आणि त्यामुळे जहाज बुडाले. जहाजात आग लागण्याचा हा निष्कर्ष जहाजामध्येच दिसलेल्या ३० फूट उंचीच्या मोठ्या काळ्या डागावरुन काढण्यात आला आहे. ज्या बाजुला जहाज हिमनगाला ठोकलं होतं त्याच जहाजाच्या मागच्या बाजुला हे काळे डाग दिसले. बॉयलर रूमच्या मागे असलेल्या इंधनाच्या स्टोरमध्ये ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. जहाजावरील १२ लोकांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आव्हान भरपूर उशीर झाला होता. ती आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेली होती. या आगीमुळे तापमान तब्बल १००० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. संशोधकांच्या या निष्कर्षाचा सबळ पुरावा म्हणजे ज्या कंपनीने टायटॅनिक बनवली त्या कंपनीचे अध्यक्ष जे. ब्रूसने यांचे विधान होय! ते म्हणाले, जहाजवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जहाजामध्ये लागलेल्या आगीबाबत प्रवाश्यांना काहीही कळता कामा नये. Click here to Like our facebook page ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता “लिटल बॉय” आकाशातून हिरोशिमाच्या अंगावर झेपावला आणि हिरोशिमा सकट पूर्ण जगाला हादरा बसला! पाठोपाठ ९ ऑगस्ट रोजी “फॅट मॅन”ने जपानचं कंबरडं मोडून ठेवलं. आजवरच्या इतिहासात, युद्धात अणू बॉम्ब वापरले गेले ते सुदैवाने हे दोनच. काय असतो हो हा अणू बॉम्ब?! मोठ्ठा स्फोट होतो. म्हणजे नेमका किती मोठ्ठा?! त्याचा आवाका काय? प्रत्येक मूलद्रव्याच्या अणू केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 2 घटक असतात. त्यांची संख्या समान असेल तर तो अणू! तात्पर्याने ते मूलद्रव्य “स्टेबल” म्हणले जाते आणि जर ही संख्या समान नसेल तर ते मूलद्रव्य अस्थिर समजलं जातं. पर्यायाने किरणोत्सर्गी! उदाहरणार्थ युरेनियम किंवा प्लुटोनिअम. ही दोन मूलद्रव्ये अणूऊर्जा बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. अत्यंत कमी वस्तुमान उपयोगात आणून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. युरेनियमच्या एका अणू केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्यातले न्यूट्रॉन फुटून वेगळे होतात आणि ते फुटलेले न्यूट्रॉन इतर अणू केंद्रकांवर जाऊन आदळतात. ही चेन रीऍक्षन काही नॅनो-सेकंदात होऊन प्रचंड ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ह्या प्रक्रियेला न्यूक्लीअर फिशन म्हणतात. ढोबळ मानाने हे अणूबॉम्बचं तत्व! १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी(कसं ते) सांगू शकेल की कुठलंही अस्थिर मूलद्रव्य न्यूट्रॉनच्या स्वरूपात किरणोत्सर्ग होत असल्याने काळानुरूप स्थिर होत जातं. त्यामुळे आण्विक उपयोगासाठी युरेनियम किंवा प्लुटोनिअम मिळवणे अवघड असते. १६ जुलै १९४५ रोजी अमेरिकेने प्रोजेक्ट मॅनहॅटन अंतर्गत न्यू मेक्सिकोच्या जॉर्नादा डेल म्युएर्टोच्या वाळवंटात “ट्रिनिटी”चं परीक्षण केलं. मानवी इतिहासातली ही पहिली अणू चाचणी! पाठोपाठ ऑगस्टमध्ये जपानवर २ दणके घातले आणि रशिया पेटून उठला!! दुसरे महायुद्ध आटोपल्यावर अमेरिका आणि रशिया दरम्यान महासत्ता होण्याची शर्यत लागली आणि आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यामध्ये दुर्दैवाने ‘कोणाच्या बॉम्ब मध्ये किती दम’ हा क्राईटेरिया सामील झाला. कुठल्या बॉम्बची शक्ती किती हे मोजण्याची पद्धत म्हणजे, झालेला स्फोट घडवण्याकरता किती TNT(बारूद) उडवावे लागेल ही! ट्रिनिटी टेस्ट २० किलो टन शक्तीची होती. म्हणजेच २० हजार टन बारूद जाळल्याने जो स्फोट होईल तितकी.हिरोशिमाचा मुडदा पाडणारा “लिटल बॉय” होता १५ किलोटनचा आणि नागासाकीचा खूनी “फॅटमॅन” होता २१ किलोटनचा! एका सुतळी बॉम्बमध्ये 2-3 ग्राम बारूद असते..!! यानंतर रशियाने देखील अणूचाचण्या करायला सुरुवात केली. अमेरिकी आणि रशियन अणू स्पर्धा शिगेला पोचली असताना शेवटचा घाव रशियाने घातला. 30 ऑक्टोबर 1961 रोजी मित्युशीखा बेटांवर रशियाने लिटल बॉय आणि फॅट मॅनच्या बापाला जन्माला घातलं. बापाचं नाव ठेवलं ‘झार बॉम्बा’..अर्थात ‘राजा बॉम्ब’. ८ मीटर लांब आणि २.१ मीटरचा परीघ असणाऱ्या ह्या राक्षसाचं वजन होतं २७ हजार किलो! एका खास बनवलेल्या विमानातून ह्या बॉम्बला मित्युशीखाला नेण्यात आलं आणि ८०० किलो वजनाचे पॅराशूटबांधून सोडण्यात आलं. का? बॉम्ब खाली पडायला वेळ लागावा आणि विमानाला सुरक्षित अंतरावर जायला काही सेकंद मिळावेत म्हणून! बॉम्ब सोडल्याबरोब्बर विमान गिरकी घेऊन जिवाच्या अकांताने पूर्ण वेगाने दूर उडालं. पॅराशूटच्या सहाय्याने तरंगत “झार” जमिनीवरून २ किलोमीटर उंचीवर आला आणि कहर झाला! भयाण, अतर्क्य मोठा स्फोट घडून आला! ४ मैल रुंद आगीचा गोळा झळाळला जो २००० किलोमीटर दूरवरून बघता येऊ शकत होता! १०० किलोमीटर परिघातल्या सगळ्या सिमेंटच्या इमारती आणि इतर गोष्टी भुईसपाट झाल्या. शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लाकडी इमारती नष्ट झाल्या. दगडी बांधकामांचे दरवाजे खिडक्या उडाले. २७० किलोमीटर दूर बसलेल्या निरीक्षकांना खास गॉगल घालून देखील आंधळं व्हायची वेळ आली. १०० किलोमीटर दूर असणाऱ्या माणसाना थर्ड डिग्रीचे चटके जाणवले. तिकडे ९०० किलोमीटर लांब फिनलंड आणि नॉर्वे मधल्या घरांच्या काचा तडकल्या!! ७०० किलोमीटर पर्यंत “शॉक वेव्ह” नोंदवली गेली. बॉम्बमुळे तयार झालेल्या “मशरूम क्लाऊड” ची उंची होती ६४ किलोमीटर. माउंट एव्हरेस्टच्या ८ पट आणि रुंदी होती ९५ किलोमीटर….! झारची क्षमता होती ५० मेगा टन. ५००००किलोटन! अमेरिकेने चाचणी घेतलेला सर्वात मोठा अणू बॉम्ब “कॅसल ब्रावो” १५ मेगाटनचा होता. लिटल बॉय १५ किलोटनचा होता ज्यात ६७ किलो युरेनियम वापरलं गेलं होतं. पैकी १ किलो पेक्षा कमी युरेनियमचं फिशन झालं आणि काही ग्राम युरेनियमचं ऊर्जेत रूपांतर झालं. अंदाज बांधा! जगाच्या इतिहासात घडवून आणला गेलेला हा सर्वात मोठा आणि विध्वंसक विस्फोट! किती मोठा?! लिटल बॉय आणि फॅटमॅनच्या एकत्रित ऊर्जेच्या १५७० पट जास्त ऊर्जा निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या सगळ्या मिळून विस्फोटकांच्या दहापट जास्त ऊर्जा! आजवर जगात जितके अणुस्फोट झाले त्याच्या एक दशांश ऊर्जा…! ही गोष्ट १९६१ सालची आहे. ५५ वर्ष लोटलीत! आज काय तंत्रज्ञान आहे?! एखादा झार दिल्ली सारख्या शहरावर पडला तर भारताची, १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची २ टक्के लोकसंख्या क्षणात गायब होईल. २ टक्के!!! पुढची शेकडो वर्षे गवताचं पातं उगणार नाही ते वेगळंच! मुंग्या देखील मरत नसतील इतकी माणसे मरतील. दिल्लीचे मैदान बनेल. कुठल्याही शहराचे! मुंबई सोबत नाशिक-पुणे फुकटात भुईसपाट! दिल्लीसह गुरगाव-आग्रा-फरिदाबाद-सोनीपतचा देखील धुव्वा! ह्या सगळ्याचा उद्देश हाच की कशाची कल्पना नसणारे लोक जेंव्हा पाकिस्तानवर एक बॉम्ब हाणा किंवा २ आपल्यावर पडू द्या हरकत नाही वगैरे बोलतात तेंव्हा धडकी भरते!! अरे तेंव्हाचा परीघ हजार किलोमीटर होता..आताचा?! आणि हो, मुळात “झार”ला १०० मेगाटन शक्ती देण्याचे ठरले होते, त्याची घडण १०० मेगाटनची होती…!! |
Author
|