ह्या पोस्टचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटणं साहजिक आहे. इंग्रज आणि मुघल इतिहासकार ‘लुटारू’ तर मराठ्यांना म्हणतात ना? मग इंग्रज आणि लुटालूट? कसं शक्य आहे? पाहूया आपण – ही गोष्ट आहे इंग्रजांनी केलेल्या लुटालुटीची आणि त्यातून उभ्या राहिलेल्या एका कोर्ट केसची (आणि त्यातून त्यांच्याच झालेल्या बदनामीची!). इंग्लंड हे पूर्वापारपासून मुख्यतः एक आरमारी राष्ट्र होते. सागरी मोहीमा काढणे – शत्रूंबरोबर समुद्रात युद्धे करणे – शत्रूची जहाजे आणि खजिना जिंकणे (किंवा लुटणे) ह्यांचा त्यांच्याकडे भक्कम अनुभव होता. रॉयल नेव्हीचेतर सरळसरळ कायदे होते की जर शत्रूची जहाजे अधिक खजिना अथवा लूट मिळाली तर ती खलाश्यांमध्ये कोणत्या प्रमाणात वाटण्यात यावी. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज जेव्हा भारतात हातपाय पसरू पहात होते तेव्हा मात्र त्यांना जमिनीवर सैन्य घेऊन लढाया कराव्या लागत आणि जमिनीवरच्या लढायांचा जास्त अनुभव नसल्याने एखादा खजिना अथवा लूट मिळाली तर ती कशी वाटून घ्यायची ह्याबद्दल विशेष असे कायदे नव्हते. ह्या जमिनीवरच्या सैन्याची अजून एक भानगड होती. ह्यातले काही सैन्य ईस्ट इंडिया कंपनीचे होते तर काही सैन्य इंग्लंडच्या राजाचे (कारण इंग्लंडच्या राजाच्या ‘क्राऊन इस्टेट’ चे ईस्ट इंडिया कंपनीत शेअर्स होते – त्यामुळे कंपनीचे हितसंबंध हेच राजाचे हितसंबंध!) होते. जेव्हा केव्हा इंग्रज सैन्य भारतात लूट करून खजिना मिळवायचे तेव्हा कंपनी आणि राजाकडून सरळ एका ‘प्राईझ एजंट’ची नेमणूक व्हायची. हा एजंट एकूण लुटीची मोजदाद करायचा. फुटकळ वस्तू स्थानिक बाजारात विकून त्यांचे पैसे जमा केले जायचे आणि ते सैनिकांमध्ये लगेच वाटून टाकले जायचे. सर्वांना आपापल्या पदानुसार आणि कामगिरीनुसार हिस्सा मिळायचा. पण ह्या लुटीत जे काही जडजवाहीर – दागदागिने असतील ते मात्र लंडनला पाठवले जायचे. ह्या सगळ्यांची किंमत ठरवली जाऊन लिलाव व्हायचा आणि मग त्यातून आलेल्या पैश्यातून राजाच्या सैन्यातल्या आणि कंपनीतल्या मोठमोठ्या ऑफीसर्सना खास बक्षिसं दिली जायची. किती ‘ऍडव्हान्सड’ लुटारू होते पहा इंग्रज! हे सगळं व्यवस्थित पद्धतशीर चाललं होतं. पण तिसऱ्या मराठे इंग्रज युद्धानंतर पेशव्यांच्या मुलुखाची – विशेषकरून पुणे, रायगड, नाशिक, कोकण, खान्देश वगैरे भागांची लुटालूट झाली आणि इंग्रजांना अमाप खजिना मिळाला. हा सगळं लंडनला पाठवण्यात आलं. ह्या खजिन्याची मोजदाद आणि मूल्यांकन करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केले गेले. त्यावर ड्यूक ऑफ वेलिंग्डन (तोच ‘वसईचा तह’ करणारा!) आणि कर्नल आर्थनॉट ह्यांना विश्वस्त नेमले गेले. लंडनच्या ८, रिजंट स्ट्रीट येथे ह्या ट्रस्टचे ऑफिस होते. इथपर्यंत सगळं ठीक होते पण ह्या खजिन्याच्या वाटणीचा मोठा तिढा होता. लुटीच्या बक्षिसाची रक्कम वाटायची होती पुढील लोकांना: १. ‘प्रत्यक्ष’ लुटीत / युद्धांत भाग घेतलेले सैनिक (जे स्वतः लढले, पेशव्यांचे प्रदेश जिंकले, आणि प्रत्यक्षपणे लूट केली) २. ‘अप्रत्यक्ष’ लुटीत / युद्धांत भाग घेतलेले सैनिक (जे स्वतः तेथे हजर नव्हते पण ज्यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली – ह्यात मुख्यतः मोठे अधिकारी होते जे स्वतः लढायला गेले नाहीत पण सर्व डावपेच ह्यांचे होते.) ३. गव्हर्नर जनरल हेस्टिंग्ज आणि राजाचे सैन्य (हे कलकत्त्याला होते पण भारतातील राजकीय घडामोडींना कागदोपत्री जबाबदार होते, त्यामुळे ह्यांना हिस्सा मिळणे भाग होतेच.) सर्व सैन्याला लुटलेल्या खजिन्याचे रिपोर्ट्स वरच्या अधिकाऱ्यांना पाठवावे लागत. पेशव्यांच्या प्रदेशात इंग्रजांना इतकी लूट मिळाली होती की त्याची अंदाजे रक्कम पाहून ह्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष – गव्हर्नर जनरल ह्यांच्यामध्ये संपूर्ण अविश्वासाचे वातावरण तयार झाले. एकमेकांवर खजिन्याचे रिपोर्ट कमी – जास्त केल्याबद्दल आरोप प्रत्यारोप होऊ लागले. हे ५-७ वर्षे चालले. शेवटी जनरल हिस्लॉप (जो राजाच्या सैन्यात होता आणि प्रत्यक्ष लढाईत त्याने भाग घेतलेला होता) ह्याने सरळ ड्यूक ऑफ वेलिंग्डनने अधिकारांचा गैरवापर करत आपल्याला ह्या लुटीतल्या बक्षिसांचा योग्य हिस्सा न दिल्याबद्दल मुंबईतल्या कोर्टात केस टाकली हीच ती (कु)प्रसिद्ध ‘डेक्कन प्राईझ मनी केस’ ची सुरुवात! ह्या केसच्या अनेक सुनावण्या होऊन मुंबईच्या सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल हिस्लॉपच्या बाजूने लागला. माउंटस्टुअर्ट एल्फिस्टन ह्याने कंपनीच्या तर्फे ह्या निकालाविरुद्ध लंडनमधल्या प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ह्या केसबद्दल प्रश्न विचारले गेले. ह्या केसचा निकाल जुलै १८३० मध्ये लागला. प्रिव्ही कौन्सिलने मुंबई सुप्रीम कोर्टाचा निकाल बाद ठरवून ड्यूक ऑफ वेलिंग्डनच्या बाजूने निकाल दिला. ह्या केसचा निकाल लागेपर्यंत कोणालाही हे दक्खन लुटीच्या बक्षिसाचे पैसे दिले गेले नाहीत. झालेल्या ह्या विलंबाबद्दल लंडनमध्ये वर्तमानपत्रात आणि पार्लमेंटमध्ये सतत हा विषय चर्चिला जात होता. शेवटी केसचा निकाल लागल्यावर सर्व सैनिकांना त्यांची बक्षिसे सव्याज देण्यात आली. ब्रिटिश लायब्ररीत ह्या केसची ओरिजिनल कागदपत्रे वाचताना लक्षात येतं की आपल्याकडच्या लुटीचा – विशेषकरून पुणे आणि रायगड – अगदी सखोल नोंदी त्यात आहेत. केससाठी पुण्यातल्या सगळ्या सावकारांचे आणि त्यांच्याकडून पेशव्यांच्या म्हणून ‘जप्त’ केलेल्या रकमांचे अगदी बारीक तपशील आहेत. कागदपत्रांत एके ठिकाणी ओझरता उल्लेख आहे की केसचा निकाल लागल्यानंतर सैनिकांना फक्त बक्षीस म्हणून १८३० मध्ये सत्तर लाख रुपये वाटले गेले – म्हणजे खजिन्याच्या एकूण मूळ रकमेची कल्पना करा. ह्या विषयावर ब्रिटीश लायब्ररीत ५०० पेक्षा जास्त मूळ कागदपत्रे आहेत. त्यांच्यातून अजून काही नवीन माहिती मिळाल्यास नक्की पोस्ट करेनच. ह्या लुटीत इंग्रजांच्या ‘नीतिमत्ते’ची आणि त्यांनी केलेल्या लुटीच्या आकड्यांची कल्पना यावी म्हणून दोन उदाहरणे बघूया. पहिले उदाहरण: कर्नल प्रॉथरने १८१८ मध्ये रायगड जिंकला. तहाच्या कलमांप्रमाणे गडावरील लोकांना खासगी पैसाअडका गड सोडताना घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली. गडावर नारो गोविंद अवटी आणि हिराचंद अनूपचंद नावाचे सावकार होते. ह्यांच्याकडे २८ थैल्यांमध्ये सुमारे ३६ लाख रुपये होते. नारो गोविंद सांगत होते की ही त्यांची खासगी मालमत्ता आहे पण हे पैसे पेशव्यांनी त्यांच्याकडे ठेवायला दिलेत असा आरोप ठवून प्रॉथरने ते सरळ लुटीत जमा करून टाकले! (पुढे नारो गोविंद अवटी आणि हिराचंद अनूपचंद ह्यांनी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनवर कोर्ट केस केली आणि १२ वर्षांनंतर हे सगळे पैसे सव्याज परत मिळवले – तो इतिहासपण वाचनीय आहे!) दुसरे उदाहरण: दुसरे बाजीराव पेशवे नाशिकजवळून पळून जात असताना माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनला बातमी लागली की त्यांनी थोडा खजिना नाशिकमध्येच लपवून ठेवलेला आहे. कॅप्टन ब्रिग्जला तो खजिना हस्तगत करायच्या कामगिरीवर लगेच पाठवले गेले. ब्रिग्जने तो खजिना शोधून लुटला. त्यावेळी नाशिकमध्येच कर्नल मॅकडोवेलपण होता. (ह्या मॅकडोवेलने पुढे तक्रार केली की लुटीच्या मोजदादीच्या वेळी ब्रिग्जने पारदर्शकता ठेवली नाही आणि बराच माल स्वतःला घेतला.) ह्या नाशिक लुटीचा मोठा भाग लंडनला पाठवला गेला. ह्या लुटीत एक ८९ कॅरेटचा जगप्रसिद्ध हिरा होता – ‘Nassak’ हे त्याचे नाव. लंडनमधल्या दख्खन खजिन्याच्या विश्वस्तांनी १८३० मध्ये ३००० पौंडांना लंडनमधले ज्वेलर्स रंडेल अँड ब्रिज ह्यांना विकला. १८३१ मध्ये रॉबर्ट ग्रॉसव्हेनरने तो विकत घेऊन त्याच्या शोभेच्या तलवारीच्या म्यानात तो जडवून घेतला. पुढे १९२० मध्ये ग्रॉसव्हेनरच्या वंशजांनी तो न्यूयॉर्कमधल्या हॅरी विन्स्टन नावाच्या अमेरिकन ज्वेलरला विकला. त्याने तो कापून ४३ कॅरेटचा बनवला आणि एका अंगठीत जडवला. मध्ये अजून दोन मालकिणींकडे हा हिरा होता. सध्या हा ‘नाशिक’ हिरा जिनेव्हाच्या मौवाद कडे आहे – किंमत फक्त ३० लाख अमेरिकन डॉलर्स किंवा जवळपास २०० कोटी रुपये! आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अण्वस्त्रांमुळे वाढलेले तणाव किती टोकाला गेले होते, हे आता उघड आहे. पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणू प्रकल्प असलेले ठिकाण बॉम्ब टाकून उडवून देण्याचा भारताचा मनसुबा होता, असे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA च्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय. अमेरिकेच्या CIA ने त्यांच्या वेबसाईट वर ९ लाख ३० हजार गुप्त कागदपत्रे जाहीर केलीय.त्यात त्यांनी नमूद केलाय कि १९८० च्या दशकात पाकिस्तान त्यांच्या आण्विक सामर्थ्यात वाढ करतोय अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने भारत सरकारला दिली. यामुळे भारताची चिंता वाढली होती. यावर उपाय म्हणून भारताने पाकिस्तानमधील कहूटा शहरातील अणुभट्टी बॉम्ब हल्ला करून उध्वस्त करण्याची छुपी मोहीम आखली होती, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला हि मोहीम राबवता आली नाही. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या गुप्त अहवालानुसार इस्राईलने ७ जुन १९८१ साली ऑपेरेशन ऑपेरा अंतर्गत इराणच्या आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला करून तो उध्वस्त केला आणि त्यांची विमाने सुरक्षितरीत्या त्यांच्या सीमेत परत गेली.त्याच धर्तीवर भारताने योजना आखली होती.कहूटा प्रदेश भारतीय सीमेपासून ४०किमीच्या अंतरावर असल्याने इस्राईलच्या तुलनेत हा हल्ला सोप्पा होता,यासाठी भारत मिग २१,आणि मिराज या लढाऊ विमानांचा वापर करणार होता.पण असा हल्ला केला तर अणुयुद्धाचा धोका होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी भारताच्या संभाव्य हल्ल्याची सूचना पाकिस्तानचे जनरल झिया उल हक याना दिली,या आल्याची पूर्व माहिती सोवियत रशियालाही होती,व त्यांचा भारताला पाठिंबा होता. १९८४ साली इंदिरा गांधी यांनी हल्ला करून हल्ला करून पाकिस्तानचा अणुप्रकल्प उध्वस्त करायला मंजुरी दिली. पण अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कारवाईच्या धमकीमुळे इंदिरा गांधींना उचलेले पाऊल मागे घ्यावे लागले. यामुळे भारतच पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइक होता होता राहिला. भारतावर दबाव बनवण्यासाठी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमधून चर्चा घडवून आणली. CIA कडून भारताच्या हल्ल्याची कल्पना भेटल्यानंतर पाकिस्तानने काहुटा अनुप्रल्पाभोवतीची सुरक्षा वाढवली. नंतर भारताला आपली माहीम गुंडाळावी लागली. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. वास्को-द-गामा म्हणजे जगाच्या सफारीसाठी निघालेला एक महत्त्वाकांक्षी दर्यावदी! भारताच्या भूमीवर पाउल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. जगाच्या सफरीसाठी निघालेल्या या खलाश्याचा संपूर्ण प्रवास अगदी रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. अश्या या बिनधास्त दर्यावर्दीचं ५०० वर्षांपूर्वी एक जहाज समुद्रात बुडालं होतं आणि आता त्या जहाजाचा शोध लागला आहे. १५०३ साली दुसऱ्या भारत दौऱ्यामध्ये वास्को द गामाच्या काकांनी वास्को द गामा जवळील एक जहाज सफारीसाठी बाहेर काढलं. पुढे मी महिन्यामध्ये हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेमध्ये विसेन्ट सॉडरस या जहाजाच्या कमांडरसह जहाजावरील सर्वांचाच बुडून मृत्यू झाला होता. सुमारे ५०० वर्षांपूर्वी बुडालेल्या याच जहाजाचे अवशेष अखेर ओमानच्या समुद्रामध्ये सापडले असून ते वास्को द गामाचंच जहाज असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. १४९९ मध्ये वास्को द गामाच्या च्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे. या जहाजाच्या शोधामुळे एक ऐतिहासिक ठेवा जगाच्या हाती लागला आहे. या जहाच्या संशोधनातून इतिहासातील काही नवीन रहस्ये उलगडतील आणि नवीन गोष्टी जगासमोर येतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा. जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक पराक्रमी कुलदीपक जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द पाहणे माउली सईबाईंच्या नशिबी नव्हतेच मुळी! युवराज संभाजी अवघे २ वर्षांचे असताना त्यांनी कैलासाची वाट धरली. जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली युवराज संभाजी तयार होत होते. आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरवपताका यशस्वीपणे पुढे न्यावी या हेतूने युवराज संभाजी लहान असल्यापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून त्यांना घडवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले की सोबत संभाजी राजांना आवर्जून नेत असतं. तसेच स्वत:हून सैन्याची लहानगी तुकडी पाठवून संभाजी राजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगतं. शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते. त्याच दरम्यान संभाजी राजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण! महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचे आमंत्रण स्वीकारले. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले. तेव्हा औरंगजेबाला वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपल्याले जगणे असह्य करणार आहे. आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजी राजांना अनेक गोष्टी शिकता आल्या. पुढे आग्र्यातून निसटणे, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणे, नानाविविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले. १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ऍबे कँरे नामक एका फ्रेंच प्रवाश्याने संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन त्यांच्यातील कुशल राज्यकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांची मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वत:ला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. आता ते स्वत: छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल रयतेमध्ये पसरलेले गैरसमज दूर करून आपण देखील आपल्या पित्याप्रमाणे स्वराज्य अजून १०० वर्षे पुढे नेऊ शकतो हे त्यांना सिद्ध करायचे होते. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले. संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा ९ वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे. केवळ २३ वर्षांचे संभाजी महाराज औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजंकडे होती महत्त्वकांक्षा! याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना पळो की सळो करून सोडले होते. गोव्यातील पोर्तुगीजां विरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वत:हून खाडीमध्ये उतरुन त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले. कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी रयतेला आपलेसे केले. प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती. लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापाला होता. संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले? ‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले. विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य! पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता, त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी! औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्याच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले. केवळ ३२ वर्षांचा त्यांचा हा जीवनप्रवास जगातील इतर जगज्जेत्यांसमोरही फिका वाटावा असाच आहे!! “संभाजी महाराजांनी काय केले?” असा प्रश्न जे विचारतात – खास त्यांच्यासाठी पुढील माहिती – संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले. स्वराज्यात चार नवीन किल्ल्यांची भर घातली. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला. युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारूगोळा कारखाना सुरु केला. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बाल मजुरी व बेटबिगारी विरूध्द कायदे तयार केले. संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले होते की त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही. संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही…! त्यांनी सामारे २७ वर्षे औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवले त्यामुळे उत्तरेकडे औरंगजेबाचे दुर्लक्ष झाले आणि तेथे इतर हिंदू सत्ता उदयास आल्या आणि उत्तरेतील हिंदू धर्म तरला. त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळले नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरवपताका फडकावली. संभाजी राजांच्या काळात स्वराज्य अधिक सुरक्षित राहील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून दाखवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा तो शब्दन शब्द खरा करून दाखवला. अवघ्या ९ वर्षांच्या कार्यकाळात एकही तह नाही की १२८ लढायांमध्ये एकही हार नाही अश्या या धर्माच्या अभिमानी, स्वराज्याच्या संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ! ३ मार्च १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांना उत्तरेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी चालून आली. १७५० च्या दशकामध्ये मराठ्यांनी उत्तरेकडील भागात अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यांनी थेट ‘अटके’पार मराठा साम्राज्य वाढविले. थोरले बाजीरावांची कारकीर्द संपेपर्यंत मराठ्यांनी एव्हाना भारतीय सीमा ओलांडत त्या पलीकडील इस्लामी राजवटींना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती. हे पाहून मराठ्यांचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे असे या राजवटींना वाटू लागले. १७५८ साली दिल्ली काबीज करत मराठ्यांनी अप्रत्यक्षरित्या अखंड भारत आपल्या कवेत घेतला. पंजाब आणि आसपासच्या प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या तिमूर शहा दुराणी याला देखील मराठ्यांनी पळवून लावले. हा तिमूर शहा दुराणी म्हणजे अहमदश अब्दालीचा थोरला पुत्र होय. ही घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरील संकट मानून चवताळलेल्या अब्दालीने आपल्या १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशाह अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता. याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून १ लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले. या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट येऊन मिळाल्याने मराठ्यांची ताकद शंभर पटींनी वाढली. या युतीने सर्वप्रथम दिल्लीवर आक्रमण केले. विश्वासरावांना दिल्लीच्या गादीवर बसवण्याचा भाऊंचा इरादा होता. पुरेशी रसद नसल्यामुळे त्यांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला आणि येथे अघटीत घडले. जाट आणि शिखांनी भाऊंचा हा देश अमान्य करीत आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात. अब्दाली आणि मराठ्यांमध्ये बारीक सारीक लढाया सुरु होत्या. कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी अब्दालीची बरीच सेना कापून काढली आणि उर्वरित सेनेला बंदी म्हणून ताब्यात घेतले. यामुळे चिडलेल्या अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली. अब्दालीने यमुना ओलंडताच मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला. पानिपत आणि सोनपत मधील संबलका येथे अब्दाली पोचताच मराठ्यांनी त्वेषाने अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविला पण इतक्यात अब्दालीची उर्वरित सेना दाखल झाली आणि मराठ्यांची ताकद कमी पडली. दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. या छोट्याश्या लढाईमध्ये अब्दालीला मराठ्यांची आणि मराठ्यांना अब्दालीची कुवत कळली. पण अब्दाली स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. त्याने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मरठी सैन्याची उपासमार होऊ लागली. पुढे दोन महिने दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करतच होते. पण अजूनही मोठ्या युद्धाला सुरुवात झाली नव्हती. दिवस सरत होते आणि मराठी सैन्यसही अन्न अपुरे पडू लागले. यावर उपाय म्हणून मराठ्यांनी स्थानिकांवर हल्ले करण्यास आणि लुटमार करण्यास सुरुवात केली. या पवित्र्यामुळे स्थानिकांचा मराठी फौजांवरचा रोष वाढीस लागला. इतक्या वेळ स्वस्थ बसलेल्या भाऊंनी अखेर स्वतहून पहिले पाउल उचलले. अन्नसाठा देखील जवळपास संपला होता. आता युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे प्रथम चालून गेला इब्राहीम खान! त्याने मराठ्यांच्या साथीने अफगाण आणि रोहिल्यांना सळो की पळो करून सोडले. भाऊंनी मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली. बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. त्यांनी अब्दालीची सेना पार धुळीला मिळवली होती. येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले. ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले. भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या. पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आहे. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली. जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली आणि यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही. कारण यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली. मुघल सत्ता तर आधीच खिळखिळी झाली होती आणि आता तर एकमेव मराठे साम्राज्य देखील घायाळ वाघाप्रमाणे निपचित पडून असल्याचे पाहून इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि १४ जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावत आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही. खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे, दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य! मराठा सैन्याने आपल्या मातीपासून १२००-१४०० किमी दूर अंतरावर जाऊन परकीयांविरोधात तेवढाच निकराने लढा दिला जेवढा त्यांनी इतर लढायांमध्ये दिला होता. पानिपताच्या रणांगणावर जर मराठा झेंडा रोवला गेला असता तर पुढचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी किती गौरवशाली असता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. लेखक अर्नाल्ड फ्लेचर हे त्यांच्या “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉनक्वेस्ट” या पुस्तकात म्हणतात, पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता. परंतु जणू कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि नशिबही! पण या पानिपताच्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे अहमदशाह अब्दालीला देखील मराठा साम्राज्याविरोधात जाणे चांगलेच महाग पडले होते, त्यामुळे पुन्हा कधीही अब्दालीने किंवा वायव्येकडील कोणत्याही साम्राज्याने भारतावर आक्रमण केले नाही. म्हणजे मराठी जरी पानिपतामध्ये हरले असले तरी त्यांनी मरता मरता त्यांनी जे शौर्य दाखवले त्याचे चीज झाले असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात, कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती ! तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !! मराठ्यांच्या हिंमतीला एवढीच दाद देऊन चालणार नाही कारण युद्ध हरल्यावर बरचसे सैन्य जरी माघारी परतले असले तरी त्याहूनही जास्त सैन्य पानिपतामध्येच राहिले आणि आज पानिपत त्यांची कर्मभूमी झाली आहे. त्यांच्या वंशजांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते. आज २५० वर्षानंतरही ज्या भूमीत त्यांच्या पूर्वजांनी गुडघे टेकले त्याच भूमीत हे रोड मराठा समाजाचे आपले बांधव मराठी झेंडा अभिमानाने रोवून आपली छाप पडत आहेत आणि आजही पानिपतातील मराठी सैन्याच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवून आहेत. हे देखील वाचा : मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज ! राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली. जगाच्या इतिहासामध्ये स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल चला काही रंजक गोष्टी जाणून घेऊया! १३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! पण त्यांनी आपलं शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केलं.राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. या मोहिमेत त्यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी संशोधन केले. अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की अंतराळातून आपलं भारत कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मा म्हणाले, सारे जहॉं से अच्छा! त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. Click here to like our facebook Page बऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्याबद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा, सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात की आजच्या प्रगत विज्ञानामध्ये त्याचाही मोठा वाटा आहे. तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता, पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे. आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार ज्यांचे पेटंट घेतलेले नाही, अश्या ह्या शास्त्रज्ञाविषयी, त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया ! निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (सध्याचं क्रोएशिया ) मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी निकोला हे चौथे अपत्य ! लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं. अद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सन १८७३ मध्ये चार वर्षाचे शिक्षण ३ वर्षांतच संपवले होते. पुढे १८७५ ला पॉलीटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते नापास झाले, त्यातच त्यांना जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही आणि ते फायनल परीक्षेत नापास झाले. त्यामुळे त्यांचे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले. पुढे ते १८८१ मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बुडापेस्टमधील एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही. पुढे ते १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम ते करू लागले . पुढे १८८४ साली तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये झाली. या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी टेस्लाला त्यांचा डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ देखील दिली नाही तेव्हा रागाने टेस्ला यांनी एडिसनची कंपनी सोडली. एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची Tesla Electric Light and Manufacturing नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्या Investors सोबतही त्यांचे काही पटले नाही. त्यांनी टेस्लाला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हलाखीची गेली. १८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली. इथं ते मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू लागले, एडिसन ने AC Current चे भय उत्पन्न करण्यासाठी चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला आणि AC ची शक्ती किती विनाशकारी याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवल. परंतु AC Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला. त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरणेच बनवत होती, त्यामुळे एडिसनने या नवीन पद्धतीला विरोध केला. टेस्लाने उद्योगपती जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबावरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे. टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे AC Electric Motor होय. त्यांनी ह्या मोटारच्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला. १८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. Hollywood मधील The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत. ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला. असे मानले जाते की टेस्ला यांनी १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष-किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले. ह्यामागे एडिसनचा हात होता असे देखील काहींचे म्हणणे आहे. Radio Wave शोध: टेस्ला ने रेडियो तरंगाचे (Radio Wave) ट्रान्समिशन करता येते, ह्या थेअरीज १८९३ मध्येच मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉडचा शोध त्यांनीच लावलेला आहे. ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले. हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता. लोकांना वाटायचे ही जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोटी मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे. पण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं. कोर्टात खुप काळ खटला चालला, पण पेटंट अखेर मार्कोनी यांना मिळाले. सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे. १८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम वीज निर्मिती सुद्धा केली. एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली. त्या विजेची गडगडाट एवढा मोठा होता की २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता. ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांनी पुढे हा पण दावा केला की Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभ्या केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे की त्यांच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्सनी धाडले होते. ज्या कामासाठी इन्वेस्टर्सनी पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला यांनी दुसरेच शोध लावले होते त्यामुळे सर्व इन्वेस्टर्सनी त्यांची लॅब बंद पाडली. १९०६ ला ५०व्या वाढदिवसाला त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी कोलोराडो धबधब्यात पॉवर स्टेशन बसवले. १९१२ मध्ये ब्रेनला इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी मांडल्या, त्यावर काही प्रयोग देखील केले.१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी ‘इलेक्ट्रिक रे’ ही प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण याबाबतीत त्यांचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरले. टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होत. त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३०० किलोमीटर दूर बॉर्डरवरून हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे की त्यामुळे शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होईल. संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेलमध्ये जीवन जगणाऱ्या ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता. त्यांच्या मृत्यू नंतर अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले. आज ही काही जण असे देखील मानतात की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकारनने लुप्त केले आहेत. निकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने त्यांच्या ७५ व्या Birthday निमित्त आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्यांच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना झाली.
चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे. सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे. सर्बियाच्या विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे. त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे. पाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे मोठाच शोध होता. अर्थात, त्यांच्यासाठी जरी तो “शोध” असेल तर आपल्यासाठी हे कित्येक हजार वर्षांपासून आपलं घरच होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘शोध’ असला तरी आपल्यासाठी फक्त ‘आणखी एक पाहुणा’ एवढंच ह्याचं महत्व. असो, मुद्दा हा की आपण सर्वांनीच शाळेत “भारताला कुणी शोधलं?” ह्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात “वास्को दा गामा” असं दिलंय. आपण इतिहासात तेच शिकलोय. सन १४९७ मध्ये जेव्हा वास्को दा गामा भारतात आला तेव्हा “भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन” म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली. पण त्याला भारताचा सागरी मार्ग दाखवणारा एक भारतीय व्यापारीच होता – ही नोंद इतिहासाने फारशी ठळकपणे घेतली नाहीये. हे आश्चर्यकारक आहे कारण – स्वतः वास्कोच्या रोजनिशीमधेच ही नोंद आहे…! प्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वास्को दा गामाची रोजीनिशी वाचली तेव्हा त्यांना ही नोंद वाचून सुखद धक्काच बसला. आपल्या रोजनिशीमध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताचा शोध का घ्यावासा वाटला, त्याची तयारी कशी केली आणि प्रवास प्रयाण कसं झालं…ह्या सगळ्या नोंदी वास्कोने करून ठेवल्या आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड जहाज बघून वास्को आश्चर्यचकित झाला. चौकशी करण्यासाठी आपल्या नोकराला त्याने ह्या भल्या मोठ्या जहाजावर पाठवलं. परतल्यावर नोकराने ‘हे भारतीय व्यापाऱ्याचं जहाज आहे’ हे सांगितलं आणि हरखून जाऊन वास्को स्वतः त्या जहाजावर गेल्या. “मला भारत शोधायचा आहे” असं म्हटल्यावर गडगडाटी हास्य करत तो ढेरपोट्या व्यापारी म्हणाला : अरे, तू काय भारत शोधणार? आमच्या अनेक पिढ्या मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये. वास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं ! अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रसिद्ध गुजराती व्यापारी कांजी मलम हाच वास्को दा गामाचा सागरी वाटाड्या होता. वास्कोला आफ्रिकेच्या मालंदी बंदरापासून कालिकत (कोझिकोडे, केरळ) बंदरावर कांजी मलमनेचं आणलं असं म्हटलं जातं. असो – कांजी मलम की आणखी कुणी – डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांच्यानुसार वास्कोला भारतात आणणारा भारतीय व्यापारीच होता, हे मात्र नक्की ! १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा हत्या करण्याचा प्रयत्न होता. परंतु अतिरेक्यांचे फुसके मनसुबे आपल्या वीर जवानांनी पार धुळीस मिळवून टाकले आणि भारताची शान असणाऱ्या संसदेची लाज राखली. परंतु जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर दहशतवाद्यांनी केलेल्या या आघाताची सल अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत आहे. विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आठवणी संसदेला पाहिल्यास आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात…. १३ डिसेंबर २००१ चा तो दिवस नेहमी सारखाच सुरु झाला. भारतीय संसदेच्या भोवताली रोज असायची तशीच परिस्थिती होती. संसदेचं कामकाजही एव्हाना सुरु झालं होतं. प्रत्येक चेहरा आपापल्या कामात व्यस्त झाला. अधिवेशन सुरु असल्याकारणाने मंत्री, खासदार आणि इतर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ति संसदेमध्ये उपस्थित होत्या. घड्याळ ११ वाजून ४० मिनिटांची वेळ दाखवत होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. गाडीवर गृहमंत्रालय आणि संसदेच स्टीकर लावलेलं असल्याने कोणत्याही अडथळ्याला तोंड न देता कार वेगाने आत शिरली. जेव्हा कार आता आली आणि थांबली तेव्हा कारमध्ये बसलेल्या एका दहशतवाद्याने बाहेर येत स्वत:ला हॅण्ड ग्रेनेडसह उडवून दिले. अचानक झालेल्या त्याच्या जबरदस्त स्फोटामुळे क्षणभर संपूर्ण वातवरण भांबावले. नक्की काय झालंय याची कुणालाही कल्पना येत नव्हती. जो तो स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्याच क्षणाला कारमध्ये बसलेल्या इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि प्रत्येकाची पळापळ सुरु झाली. हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेबाहेर पडले होते, परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजनांसमवेत १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि इतर भागात उपस्थित होते. या गोष्टीची जाणीव होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केले आणि खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याच्या दहशतवाद्यांच्या योजनेला सुरुंग लावला. कारमध्ये एकूण ६ दहशतवादी होते. त्यापैकी एकाने आत्मघातकी स्फोट घडवत स्वत:चा जीव दिला, तर इतर ५ जणांसोबत कडवी झुंज देत सुरक्षा जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांना कंठस्नान घातले. अर्ध्या तास चालेल्या या थरारनाट्यात ५ जवानांनी प्राणांचे बलिदान दिले, तर ९ जणांना दहशतवाद्यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात स्वत:चा प्राण गमवावा लागला. |
Author
|