ह्या पोस्टचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटणं साहजिक आहे. इंग्रज आणि मुघल इतिहासकार ‘लुटारू’ तर मराठ्यांना म्हणतात ना? मग इंग्रज आणि लुटालूट? कसं शक्य आहे? पाहूया आपण – ही गोष्ट आहे इंग्रजांनी केलेल्या लुटालुटीची आणि त्यातून उभ्या राहिलेल्या एका कोर्ट केसची (आणि त्यातून त्यांच्याच झालेल्या बदनामीची!). इंग्लंड हे पूर्वापारपासून मुख्यतः एक आरमारी राष्ट्र होते. सागरी मोहीमा काढणे – शत्रूंबरोबर समुद्रात युद्धे करणे – शत्रूची जहाजे आणि खजिना जिंकणे (किंवा लुटणे) ह्यांचा त्यांच्याकडे भक्कम अनुभव होता. रॉयल नेव्हीचेतर सरळसरळ कायदे होते की जर शत्रूची जहाजे अधिक खजिना अथवा लूट मिळाली तर ती खलाश्यांमध्ये कोणत्या प्रमाणात वाटण्यात यावी. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज जेव्हा भारतात हातपाय पसरू पहात होते तेव्हा मात्र त्यांना जमिनीवर सैन्य घेऊन लढाया कराव्या लागत आणि जमिनीवरच्या लढायांचा जास्त अनुभव नसल्याने एखादा खजिना अथवा लूट मिळाली तर ती कशी वाटून घ्यायची ह्याबद्दल विशेष असे कायदे नव्हते. ह्या जमिनीवरच्या सैन्याची अजून एक भानगड होती. ह्यातले काही सैन्य ईस्ट इंडिया कंपनीचे होते तर काही सैन्य इंग्लंडच्या राजाचे (कारण इंग्लंडच्या राजाच्या ‘क्राऊन इस्टेट’ चे ईस्ट इंडिया कंपनीत शेअर्स होते – त्यामुळे कंपनीचे हितसंबंध हेच राजाचे हितसंबंध!) होते. जेव्हा केव्हा इंग्रज सैन्य भारतात लूट करून खजिना मिळवायचे तेव्हा कंपनी आणि राजाकडून सरळ एका ‘प्राईझ एजंट’ची नेमणूक व्हायची. हा एजंट एकूण लुटीची मोजदाद करायचा. फुटकळ वस्तू स्थानिक बाजारात विकून त्यांचे पैसे जमा केले जायचे आणि ते सैनिकांमध्ये लगेच वाटून टाकले जायचे. सर्वांना आपापल्या पदानुसार आणि कामगिरीनुसार हिस्सा मिळायचा. पण ह्या लुटीत जे काही जडजवाहीर – दागदागिने असतील ते मात्र लंडनला पाठवले जायचे. ह्या सगळ्यांची किंमत ठरवली जाऊन लिलाव व्हायचा आणि मग त्यातून आलेल्या पैश्यातून राजाच्या सैन्यातल्या आणि कंपनीतल्या मोठमोठ्या ऑफीसर्सना खास बक्षिसं दिली जायची. किती ‘ऍडव्हान्सड’ लुटारू होते पहा इंग्रज! हे सगळं व्यवस्थित पद्धतशीर चाललं होतं. पण तिसऱ्या मराठे इंग्रज युद्धानंतर पेशव्यांच्या मुलुखाची – विशेषकरून पुणे, रायगड, नाशिक, कोकण, खान्देश वगैरे भागांची लुटालूट झाली आणि इंग्रजांना अमाप खजिना मिळाला. हा सगळं लंडनला पाठवण्यात आलं. ह्या खजिन्याची मोजदाद आणि मूल्यांकन करण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केले गेले. त्यावर ड्यूक ऑफ वेलिंग्डन (तोच ‘वसईचा तह’ करणारा!) आणि कर्नल आर्थनॉट ह्यांना विश्वस्त नेमले गेले. लंडनच्या ८, रिजंट स्ट्रीट येथे ह्या ट्रस्टचे ऑफिस होते. इथपर्यंत सगळं ठीक होते पण ह्या खजिन्याच्या वाटणीचा मोठा तिढा होता. लुटीच्या बक्षिसाची रक्कम वाटायची होती पुढील लोकांना: १. ‘प्रत्यक्ष’ लुटीत / युद्धांत भाग घेतलेले सैनिक (जे स्वतः लढले, पेशव्यांचे प्रदेश जिंकले, आणि प्रत्यक्षपणे लूट केली) २. ‘अप्रत्यक्ष’ लुटीत / युद्धांत भाग घेतलेले सैनिक (जे स्वतः तेथे हजर नव्हते पण ज्यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली – ह्यात मुख्यतः मोठे अधिकारी होते जे स्वतः लढायला गेले नाहीत पण सर्व डावपेच ह्यांचे होते.) ३. गव्हर्नर जनरल हेस्टिंग्ज आणि राजाचे सैन्य (हे कलकत्त्याला होते पण भारतातील राजकीय घडामोडींना कागदोपत्री जबाबदार होते, त्यामुळे ह्यांना हिस्सा मिळणे भाग होतेच.) सर्व सैन्याला लुटलेल्या खजिन्याचे रिपोर्ट्स वरच्या अधिकाऱ्यांना पाठवावे लागत. पेशव्यांच्या प्रदेशात इंग्रजांना इतकी लूट मिळाली होती की त्याची अंदाजे रक्कम पाहून ह्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष – गव्हर्नर जनरल ह्यांच्यामध्ये संपूर्ण अविश्वासाचे वातावरण तयार झाले. एकमेकांवर खजिन्याचे रिपोर्ट कमी – जास्त केल्याबद्दल आरोप प्रत्यारोप होऊ लागले. हे ५-७ वर्षे चालले. शेवटी जनरल हिस्लॉप (जो राजाच्या सैन्यात होता आणि प्रत्यक्ष लढाईत त्याने भाग घेतलेला होता) ह्याने सरळ ड्यूक ऑफ वेलिंग्डनने अधिकारांचा गैरवापर करत आपल्याला ह्या लुटीतल्या बक्षिसांचा योग्य हिस्सा न दिल्याबद्दल मुंबईतल्या कोर्टात केस टाकली हीच ती (कु)प्रसिद्ध ‘डेक्कन प्राईझ मनी केस’ ची सुरुवात! ह्या केसच्या अनेक सुनावण्या होऊन मुंबईच्या सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल हिस्लॉपच्या बाजूने लागला. माउंटस्टुअर्ट एल्फिस्टन ह्याने कंपनीच्या तर्फे ह्या निकालाविरुद्ध लंडनमधल्या प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ह्या केसबद्दल प्रश्न विचारले गेले. ह्या केसचा निकाल जुलै १८३० मध्ये लागला. प्रिव्ही कौन्सिलने मुंबई सुप्रीम कोर्टाचा निकाल बाद ठरवून ड्यूक ऑफ वेलिंग्डनच्या बाजूने निकाल दिला. ह्या केसचा निकाल लागेपर्यंत कोणालाही हे दक्खन लुटीच्या बक्षिसाचे पैसे दिले गेले नाहीत. झालेल्या ह्या विलंबाबद्दल लंडनमध्ये वर्तमानपत्रात आणि पार्लमेंटमध्ये सतत हा विषय चर्चिला जात होता. शेवटी केसचा निकाल लागल्यावर सर्व सैनिकांना त्यांची बक्षिसे सव्याज देण्यात आली. ब्रिटिश लायब्ररीत ह्या केसची ओरिजिनल कागदपत्रे वाचताना लक्षात येतं की आपल्याकडच्या लुटीचा – विशेषकरून पुणे आणि रायगड – अगदी सखोल नोंदी त्यात आहेत. केससाठी पुण्यातल्या सगळ्या सावकारांचे आणि त्यांच्याकडून पेशव्यांच्या म्हणून ‘जप्त’ केलेल्या रकमांचे अगदी बारीक तपशील आहेत. कागदपत्रांत एके ठिकाणी ओझरता उल्लेख आहे की केसचा निकाल लागल्यानंतर सैनिकांना फक्त बक्षीस म्हणून १८३० मध्ये सत्तर लाख रुपये वाटले गेले – म्हणजे खजिन्याच्या एकूण मूळ रकमेची कल्पना करा. ह्या विषयावर ब्रिटीश लायब्ररीत ५०० पेक्षा जास्त मूळ कागदपत्रे आहेत. त्यांच्यातून अजून काही नवीन माहिती मिळाल्यास नक्की पोस्ट करेनच. ह्या लुटीत इंग्रजांच्या ‘नीतिमत्ते’ची आणि त्यांनी केलेल्या लुटीच्या आकड्यांची कल्पना यावी म्हणून दोन उदाहरणे बघूया. पहिले उदाहरण: कर्नल प्रॉथरने १८१८ मध्ये रायगड जिंकला. तहाच्या कलमांप्रमाणे गडावरील लोकांना खासगी पैसाअडका गड सोडताना घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली. गडावर नारो गोविंद अवटी आणि हिराचंद अनूपचंद नावाचे सावकार होते. ह्यांच्याकडे २८ थैल्यांमध्ये सुमारे ३६ लाख रुपये होते. नारो गोविंद सांगत होते की ही त्यांची खासगी मालमत्ता आहे पण हे पैसे पेशव्यांनी त्यांच्याकडे ठेवायला दिलेत असा आरोप ठवून प्रॉथरने ते सरळ लुटीत जमा करून टाकले! (पुढे नारो गोविंद अवटी आणि हिराचंद अनूपचंद ह्यांनी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनवर कोर्ट केस केली आणि १२ वर्षांनंतर हे सगळे पैसे सव्याज परत मिळवले – तो इतिहासपण वाचनीय आहे!) दुसरे उदाहरण: दुसरे बाजीराव पेशवे नाशिकजवळून पळून जात असताना माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनला बातमी लागली की त्यांनी थोडा खजिना नाशिकमध्येच लपवून ठेवलेला आहे. कॅप्टन ब्रिग्जला तो खजिना हस्तगत करायच्या कामगिरीवर लगेच पाठवले गेले. ब्रिग्जने तो खजिना शोधून लुटला. त्यावेळी नाशिकमध्येच कर्नल मॅकडोवेलपण होता. (ह्या मॅकडोवेलने पुढे तक्रार केली की लुटीच्या मोजदादीच्या वेळी ब्रिग्जने पारदर्शकता ठेवली नाही आणि बराच माल स्वतःला घेतला.) ह्या नाशिक लुटीचा मोठा भाग लंडनला पाठवला गेला. ह्या लुटीत एक ८९ कॅरेटचा जगप्रसिद्ध हिरा होता – ‘Nassak’ हे त्याचे नाव. लंडनमधल्या दख्खन खजिन्याच्या विश्वस्तांनी १८३० मध्ये ३००० पौंडांना लंडनमधले ज्वेलर्स रंडेल अँड ब्रिज ह्यांना विकला. १८३१ मध्ये रॉबर्ट ग्रॉसव्हेनरने तो विकत घेऊन त्याच्या शोभेच्या तलवारीच्या म्यानात तो जडवून घेतला. पुढे १९२० मध्ये ग्रॉसव्हेनरच्या वंशजांनी तो न्यूयॉर्कमधल्या हॅरी विन्स्टन नावाच्या अमेरिकन ज्वेलरला विकला. त्याने तो कापून ४३ कॅरेटचा बनवला आणि एका अंगठीत जडवला. मध्ये अजून दोन मालकिणींकडे हा हिरा होता. सध्या हा ‘नाशिक’ हिरा जिनेव्हाच्या मौवाद कडे आहे – किंमत फक्त ३० लाख अमेरिकन डॉलर्स किंवा जवळपास २०० कोटी रुपये! आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अण्वस्त्रांमुळे वाढलेले तणाव किती टोकाला गेले होते, हे आता उघड आहे. पाकिस्तानच्या काहुटा शहरातील अणू प्रकल्प असलेले ठिकाण बॉम्ब टाकून उडवून देण्याचा भारताचा मनसुबा होता, असे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA च्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालंय. अमेरिकेच्या CIA ने त्यांच्या वेबसाईट वर ९ लाख ३० हजार गुप्त कागदपत्रे जाहीर केलीय.त्यात त्यांनी नमूद केलाय कि १९८० च्या दशकात पाकिस्तान त्यांच्या आण्विक सामर्थ्यात वाढ करतोय अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने भारत सरकारला दिली. यामुळे भारताची चिंता वाढली होती. यावर उपाय म्हणून भारताने पाकिस्तानमधील कहूटा शहरातील अणुभट्टी बॉम्ब हल्ला करून उध्वस्त करण्याची छुपी मोहीम आखली होती, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला हि मोहीम राबवता आली नाही. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या गुप्त अहवालानुसार इस्राईलने ७ जुन १९८१ साली ऑपेरेशन ऑपेरा अंतर्गत इराणच्या आण्विक प्रकल्पांवर बॉम्ब हल्ला करून तो उध्वस्त केला आणि त्यांची विमाने सुरक्षितरीत्या त्यांच्या सीमेत परत गेली.त्याच धर्तीवर भारताने योजना आखली होती.कहूटा प्रदेश भारतीय सीमेपासून ४०किमीच्या अंतरावर असल्याने इस्राईलच्या तुलनेत हा हल्ला सोप्पा होता,यासाठी भारत मिग २१,आणि मिराज या लढाऊ विमानांचा वापर करणार होता.पण असा हल्ला केला तर अणुयुद्धाचा धोका होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी भारताच्या संभाव्य हल्ल्याची सूचना पाकिस्तानचे जनरल झिया उल हक याना दिली,या आल्याची पूर्व माहिती सोवियत रशियालाही होती,व त्यांचा भारताला पाठिंबा होता. १९८४ साली इंदिरा गांधी यांनी हल्ला करून हल्ला करून पाकिस्तानचा अणुप्रकल्प उध्वस्त करायला मंजुरी दिली. पण अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कारवाईच्या धमकीमुळे इंदिरा गांधींना उचलेले पाऊल मागे घ्यावे लागले. यामुळे भारतच पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइक होता होता राहिला. भारतावर दबाव बनवण्यासाठी अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांमधून चर्चा घडवून आणली. CIA कडून भारताच्या हल्ल्याची कल्पना भेटल्यानंतर पाकिस्तानने काहुटा अनुप्रल्पाभोवतीची सुरक्षा वाढवली. नंतर भारताला आपली माहीम गुंडाळावी लागली. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा.
बघूया आत्तापर्यंत भाराताच्या लोकशाही सोहळ्याला उपस्तित राहिलेले प्रमुख अतिथी. वर्षमुख्य अतिथि देश पद 2017 शेख मोहमद बिन ज़ायेद अल नाह्यान अबु धाबी क्राउन प्रिंस 2016 फ्रांस्वा ओलांद फ्रांसचे राष्ट्रपति 2015 बराक ओबामा अमेरिका राष्ट्रपति 2014 शिंजो अबे जापान प्रधानमन्त्री 2013 जिग्मे खेसर नामग्यल वांग्चुक भूटान नरेश 2012 यींगलक शिनावात्राथा प्रथम महिला प्रधानमन्त्री 2011 सुसिलो बाम्बांग युधोयोनो इंडोनेशिया राष्ट्रपति 2010 ली म्यूंग बाककोरिया गणराज्य (दक्षिण कोरिया) राष्ट्रपति 2009 नूर सुल्तान नजरबायेब कज़ाख़िस्तान राष्ट्रपति 2008 निकोलस सर्कोजी फ्रांस राष्ट्रपति 2007 व्लादिमीर पुतिन रूस राष्ट्रपति 2006 अब्दुल्ला बिन अब्दुल अज़ीज़ अल-सऊद सउदी अरब शाह 2005 वांगचुक भूटान नरेश 2004 लुईज़ इनासियो लूला द सिल्वा ब्राज़ील राष्ट्रपति 2003 मोहम्मद ख़ातमी ईरान राष्ट्रपति 2002 कसाम उतीम मॉरीशस राष्ट्रपति 2001 अब्देलाज़िज बुटेफ्लिका अलजीरीया राष्ट्रपति 2000 ओलूसेगुन ओबाझाँजो नाइजीरिया राष्ट्रपति 1999 बिरेन्द्र बीर बिक्रम शाह देवनेपाल नरेश 1998 जैक्स चिराक फ्रांस राष्ट्रपति 1997 बासदियो पांडेयत्रिनिनाड टोबैगो प्रधानमंत्री 1996 डॉ. फरनॉनडो हेनरिक कारडोसो ब्राजील राष्ट्रपति 1995 नेल्सन मंडेलादक्षिण अफ़्रीका राष्ट्रपति 1994 गोह चोक टोंग सिंगापुर प्रधानमंत्री 1993 जॉन मेजर ब्रिटेन प्रधानमंत्री 1992 मारियो सोर्स पुर्तगाल राष्ट्रपति 1991 मौमून अब्दुल गयूम मालदीव राष्ट्रपति 1990 अनिरुद्ध जुगनौत मॉरीशस प्रधानमंत्री 1989 गुयेन वैन लिंह वियतनाम प्रधान सचिव 1988 जुनियस जयवर्द्धने श्रीलंका प्रधानमंत्री 1987 ऐलेन गार्सिया पेरु प्रधानमंत्री 1986 एँड्रियास पपनड्रीयु ग्रीस प्रधानमंत्री 1985 रॉल अलफोन्सिन अर्जेन्टीना राष्ट्रपति 1984 जिग्मे सिंघे वाँगचुक भूटान नरेश 1983 सेहु शगारी नाइजीरिया राष्ट्रपति 1982 जॉन कार्लोस प्रथम स्पेन राष्ट्रपति 1981 जोस लोपेज़ पोरेटील्लो मेक्सिको राष्ट्रपति 1980 वलेरी गिस्कार्ड द इस्टेइंग फ्रांस राष्ट्रपति 1979 मलकोल्म फ्रेज़र ऑस्ट्रेलिया प्रधानमंत्री 1978 पैट्रीक हिलेरी ऑयरलैंड राष्ट्रपति 1977 एडवर्ड गिरेक पौलैण्ड प्रथम सचिव 1976 जैक्स चिराक फ्रांस प्रधानमंत्री 1975 केनेथ कौंडा जांबिया राष्ट्रपति 1974 सिरीमावो रतवत्ते दियास बंदरनायके यूगोस्लाविया राष्ट्रपति 1973 मोबुतु सेस सीकोजैरे राष्ट्रपति 1972 सीवुसागर रामगुलाम मॉरीशस प्रधानमंत्री 1971 जुलियस नीयरेरे तंजानिया राष्ट्रपति 1970 - - 1969 टोडर ज़िकोव बुल्गारिया प्रधानमंत्री 1968जोसिप ब्रोज टीटो एवं एलेक्सी कोज़ीगिनराष्ट्रपति यूगोस्लाविया, प्रधानमंत्री सोवियत यूनियन 1967 - - 1966 - - 1965 राना अब्दुल हामिद पाकिस्तान खाद्य एवं कृषि मंत्री 1964 - - 1963 नोरोदम शिनौक कंबोडिया राजा 1962-- 1961 एलिज़ाबेथ द्वितीय ब्रिटेन रानी, 1960 क्लिमेंट वोरोशिलोव सोवियत संघ राष्ट्रपति 1959 - - 1958 मार्शल यि जियानयिंग चीन 1957 - - 1956 - - 1955 मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तान गर्वनर जनरल 1954 जिग्मे दोरजी वाँगचुक भूटान नरेश 1953-- 1952-- 1952-- 1950 सुकर्णो इंडोनेशिया राष्ट्रपति आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. आजपर्यंतचा सर्वात क्रूर हुकूमशहा म्हटलं कि आपल्यासमोर येतो तो एडॉल्फ हिटलर, पण जरा थांबा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अश्या हुकूमशहा बद्दल ज्याच्या क्रूरतेसमोर हिटलर चा कुठेच निभाव नाही लागत,त्याचा नाव आहे ईदी अमीन, तो युगांडा चा हुकूमशहा होता. त्याच्या भयावह दहशतीमुळे जग त्याला ‘मैड मैन ऑफ अफ्रीका’ या नावानेही ओळखायचं. अमीन चा जन्म 1925 साली कोबोको मध्ये झाला. ईदी अमीन १९७१ ते १९७९ सैन्य नेता व राष्ट्रपति होता. अमीन १९४६ मध्ये एक सहाय्यक स्वयंपाकी म्हणून अस्थायी ब्रिटिश औपनिवेशिक सेनेच्या किंग्स अफ्रीकन राइफल्स मध्ये सहभागी झाला होता. लवकरच त्याला मेजर जनरल पदापर्यंत बढती भेटली, १९७१ साली बंड करून मिल्टन ओबोटे ला राष्ट्रपति पदावरून हटवून अमीन स्वतः युगांडा चा राष्ट्रपति झाला. त्याने स्वतःला सगळ्या सशस्त्र बळाचा प्रमुख कमांडर, आर्मी चीफ ऑफ स्टाफ और चीफ ऑफ एयर स्टाफ घोषित केलं. हे सर्व करत असताने त्याने लीबिया चे प्रमुख मुअम्मर अल-गद्दाफी व सोवियत संघ आणि पूर्वी जर्मनीचा समर्थन मिळवलं. राष्ट्रपति असताने त्याने लोकांवर खूप जुलूम केले, लांगो आणि अछोली जातीच्या जवळपास ५ लाख लोकांची त्याने कत्तल केली. ईदी ची शिक्षा द्यायची पद्धत पण खूप क्रूर होती,तो लोकांना फाशी किंवा गोळी मारायची शिक्षा देत नव्हता तर तो लोकांना जिवंत जमिनीत दफन करायचा किंवा उपाशी मगरींपुढे फेकून द्यायचा. ईदीने त्याच्या महालातील सर्व सुंदर महिलावर अत्याचार केले त्याला विरोध करणाऱ्या सर्वाना जीवाला मुकावे लागले, तो माणसांचे मांस खाण्याचाही शौकीन होता,तो आपल्या फ्रिज मध्ये मारलेल्या माणसांचे कापलेले डोके ठेवायचा. १९७९ मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेनी अमीनची हुकूमशाही जडापासून उखडून फेकली. त्याच्यानंतर अमीनला देश सोडून पाळावा लागलं. त्यानंतर त्याने काही दिवस लिबिया आणि नंतर साऊदी अरब मध्ये शरण घेतली, तिथेच तो १६ ऑगस्ट २००३ रोजी मरण पावला. आमचा वरील लेख आवडला असेल तर आम्हला नक्की कळावा, व आमच्या वेबसाईट वरील अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल फेसबुक पेज नक्की like करा. वास्को-द-गामा म्हणजे जगाच्या सफारीसाठी निघालेला एक महत्त्वाकांक्षी दर्यावदी! भारताच्या भूमीवर पाउल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. जगाच्या सफरीसाठी निघालेल्या या खलाश्याचा संपूर्ण प्रवास अगदी रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. अश्या या बिनधास्त दर्यावर्दीचं ५०० वर्षांपूर्वी एक जहाज समुद्रात बुडालं होतं आणि आता त्या जहाजाचा शोध लागला आहे. १५०३ साली दुसऱ्या भारत दौऱ्यामध्ये वास्को द गामाच्या काकांनी वास्को द गामा जवळील एक जहाज सफारीसाठी बाहेर काढलं. पुढे मी महिन्यामध्ये हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेमध्ये विसेन्ट सॉडरस या जहाजाच्या कमांडरसह जहाजावरील सर्वांचाच बुडून मृत्यू झाला होता. सुमारे ५०० वर्षांपूर्वी बुडालेल्या याच जहाजाचे अवशेष अखेर ओमानच्या समुद्रामध्ये सापडले असून ते वास्को द गामाचंच जहाज असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. १४९९ मध्ये वास्को द गामाच्या च्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे. या जहाजाच्या शोधामुळे एक ऐतिहासिक ठेवा जगाच्या हाती लागला आहे. या जहाच्या संशोधनातून इतिहासातील काही नवीन रहस्ये उलगडतील आणि नवीन गोष्टी जगासमोर येतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा. दहशतवाद हे मानवी राक्षसाचे आधुनिक रूप! गेल्या काही वर्षांत हा राक्षस अधिकच बोकाळला आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला वेळीच आळा घातला नाही तर येणारे युग हे अतिशय भयंकर असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असेल की दहशतवादामध्ये केवळ पुरुषांचा सहभाग असतो तर तुमचा हा समज पूर्णत चुकीचा आहे. कारण जगातील सर्वच दहशतवादी संघटनांमध्ये महिला देखील तितक्याच सक्रीय आहेत जेवढे की पुरुष सक्रीय आहेत. गेल्या काही वर्षातील दहशतवादी हल्ल्यांमधून ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे की दहशतवादी संघटनांमध्ये महिलांचा सहभाग वेगाने वाढतो आहे. जगातील काही खतरनाक दहशतवादी संघटनांमधील महिला देखील इतक्या खतरनाक आहेत की गुप्तहेर यंत्रणा हात धुवून त्यांच्या मागे लागल्या आहेत आणि त्यांनी या महिलांना मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे. हिटलिस्ट मधील बऱ्याचश्या महिला दहशतवाद्यांना जरी कंठस्नान घालण्यात या गुप्तहेर यंत्रणांना यश आले असले तरी बऱ्याचश्या धोकादायक महिला आजही मोकाट आहेत. चला जाणून घेऊया त्यापैकी चार मोस्ट वॉन्टेड महिला दहशतवाद्यांबद्दल! हसना अत बोलाचेन फ्रान्समधील पॅरिस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेली हसना ही युरोपमधील पहिला महिला दहशतवादी असल्याचेही म्हटलं जात आहे. पॅरिस हल्ल्याच्या तपासादरम्यान, जेव्हा पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्या छापा टाकला, त्यावेळी तिथे हसना हजर होती. मात्र, तिने पोलिसांना शरण जाण्याऐवजी स्वत:लाच बंदुकीनं उडवलं. हसनाने स्वत:ला गोळी मारल्याच्या वृत्ताचं फ्रान्स पोलिसांनी खंडण केलं आहे. हसनाचं लहनापण प्रचंड वेदनादायी होतं. मात्र, तिला ओळखणाऱ्या कुणालाही असं वाटत नव्हतं की, हसना दहशतावाद किंवा कट्टरतावादकडे झुकेल. हसनाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, तिने कधीच कुराण उघडून पाहिलं नाही. मात्र, ती नेहमी फेसबुक आणि व्हॉट्सअप बघायची. असाता शकुर क्युबामध्ये राहणारी असाता ही अनेक दहशतवादी कार्यांमध्ये सक्रीय आहे. १९७१ ते १९७३ या तीन वर्षांच्या कालावधीत असाता अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे. १९७९ मध्ये एका बँक दरोडा आणि एका पोलिसाची हत्या या गुन्ह्यांमध्ये असाता शिक्षा भोगत असताना अमेरिकेतून क्युबामध्ये पळून आली. गेल्या ३० वर्षांपासून असातावर मोठ-मोठे बक्षीस जाहीर झाले आहेत. समांथा ल्यूथवेट व्हाईट विडो या नावाने ओळखली जाणारी ब्रिटनची नागरिक समांथाला अनेक देशांचे पोलीस शोधत आहेत. समांथा प्रचंड खतरनाक महिला दहशतवादी म्हणून ओळखली जाते. ७ जुलै २००५ मधील लंडनमधील एका सार्वजनिक बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात समांथासह तिचा पती जर्मेन लिंडेसचाही सहभाग होता. २०१३ साली नायोरबीमधील शॉपिंग मॉलमधील हल्ल्यामागेही समांथाचा हात होता, असे म्हटले जात आहे. या हल्ल्यात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महिलांना सुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देण्याचा आरोपही समांथावर आहे. तशफीन मलिक ३१ वर्षीय तशफीन मलिक हिने तिचा पती सय्यद फारुख याच्यासोबतीने कॅलिफोर्नियातील एका कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार करुन १४ लोकांची हत्या केली. असे म्हटलं जातं की, तशफीन ही कॉलेजमध्ये सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखी जायची. मात्र, याची कुठेही माहिती मिळत नाही, की तशफीन कट्टरतावादाकडे कशी आणि केव्हा झुकली. तशफीन आणि फारुख या दहशतवादी दाम्पत्याला एक सहा महिन्यांची मुलगी आहे, या मुलीला त्यांनी फारुखच्या आईकडे सोडलं आहे. दहशतवादाचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी असे सांगितलं आहे की, मुल जन्माला घालणं हे या दहशतवादी दाम्पत्याची रणनिती असण्याची शक्यता आहे. मुल आहे म्हणजे तशफीन आणि फारुख हे सर्वसामान्य दाम्पत्य आहे, असा समज निर्माण व्हावा यासाठी या दोघांनी मुल जन्माला घातलं असावं, असाही जाणकारांचे म्हणणे आहे. दहशतवादासारख्या हीन कृत्यांमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही फारच चिंतेची बाब आहे. यासाठी संपूर्ण जगभर वेळीच समाज प्रबोधन केले तर कदाचित भविष्यात महिला दहशतवादी बनण्यापेक्षा त्या विरोधात लढण्यासाठी उभ्या राहतील. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी क्लिक करा. वार्ताहराने कसे असायला हवे, याचे विसाव्या शतकातील एक ठसठशीत आदर्श ठरणारे उदाहरण म्हणजे क्लेअर हॉलिंगवर्थ. सन १९३९च्या ऑगस्टमध्ये नुकतीच ‘द टेलिग्राफ’ या दैनिकात नोकरीस लागलेली सुमारे २७ वर्षांची तरुणी पोलंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, तिथे जाता येत नाही म्हणून थेट ब्रिटिश वाणिज्यदूताची मोटारगाडी मिळवते आणि जर्मनव्याप्त पोलिश भूमीत शिरून शंभरावर रणगाडे पाहाते.. काय होणार आहे याचा तिला अंदाज येतो, कॅमेरा नसल्याने ती रणगाडय़ांचेच जमिनीवर पडलेले भाग जमवते आणि बातमी देते : जर्मनी मोठय़ा आक्रमणाच्या तयारीत! ‘सनसनाटी’ म्हणून वार्ताहरांच्या कष्टांना हिणवण्याची रीत तेव्हाही होती, पण तेव्हाचीही वृत्तपत्रे अशा लोकभावनेपेक्षा वार्ताहरांवरच विश्वास ठेवत, म्हणून घडत्या इतिहासाची ही पहिली खूण तातडीने ब्रिटिशांपर्यंत पोहोचू शकली. ही बातमी अर्थातच खरी ठरली, तेव्हा क्लेअर हॉलिंगवर्थ मात्र जर्मनव्याप्त ऑस्ट्रियात अडकल्या होत्या. ही एवढी एकच बातमी देऊन जरी त्या १०५ वर्षे जगल्या असत्या, मग १० जानेवारीच्या मंगळवारी हाँगकाँगहून त्यांची निधनवार्ता आली असती.. तरीही पत्रकारितेवर प्रेम करणारे हळहळलेच असते. निधनवार्ता आली, पण क्लेअर हॉलिंगवर्थ यांनी केवळ त्या एका बातमीपुरते काम केले नव्हते.. त्यांचे काम इतके की, जगाने त्यांच्या कर्तृत्वाकडे मागे वळून पाहाताना अचंबित व्हावे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्या बुखारेस्टला होत्या. सर्वच पत्रकारांवर र्निबध होते. ते डावलून ब्रिटनला बातम्या पाठवणे क्लेअर यांनी आरंभले. सुगावा लागून हंगेरीचे पोलीस अटकेसाठी आल्यावर हिने काही चपळ कृती केल्या आणि म्हणाली : मी विवस्त्र आहे, तुम्ही मला अटक करूच शकत नाही. अखेर पोलिसांनी ब्लँकेट टाकून क्लेअर यांना ताब्यात घेतले खरे, पण या अटकेनंतर ‘अटकेलाही घाबरायचे नाही’ हेच क्लेअर शिकल्या! युद्ध संपल्यावर आधी जेरुसलेमला, मग कैरोत आणि अखेर फ्रान्सला, पॅरिस शहरातच त्यांना पाठवण्यात आले, तर तिथून त्या सारख्या अल्जेरियात जाऊ लागल्या.. फ्रान्सशी त्या देशाचा स्वातंत्र्यलढा ऐन हिंसेच्या भरात असताना, अल्जेरियाच्या केवळ राजधानीत नव्हे तर लहान गावांमध्ये फिरून फ्रान्सची दडपशाही कशी सर्वदूर आहे, याचे वृत्तान्त देऊ लागल्या. ‘स्वस्थ बसायचे नाहीच’ हे वार्ताहराचे ब्रीद त्या जगत होत्या. ब्रिटिश शासकांच्या मर्जीबाहेर काम न केल्याचा संशय त्यांच्या इथवरच्या कारकीर्दीवर घेतला जाऊ शकला असता, ती शक्यताही क्लेअर यांच्या एका बातमीमुळे धुडकावली गेली. ब्रिटिश हेर किम फिल्बी हे क्लेअर यांच्या परिचयाचे; पण ‘फिल्बी बहुधा केजीबीसाठीही छुपेपणाने काम करीत असावेत’ ही शंका पहिल्यांदा बातमीद्वारे नोंदवली ती क्लेअर यांनीच. तिचा इन्कार तत्कालीन पंतप्रधानांनी केला. पण अखेर अनेकांच्या पाठपुराव्यानंतर, बातमी खरी ठरली व फिल्बींना कबुली द्यावी लागली. एखादी विशिष्ट श्रेणी मानून त्या श्रेणीत आलेली ‘पहिली महिला’ वगैरे बिरुदे क्लेअर यांना मिळत होतीच, पण महिला असण्याचे त्यांना काही विशेष वाटत नसे. ‘फ्रंट लाइन’ हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले. उत्तरायुष्यात – म्हणजे नव्वदीपार गेल्यानंतर – त्या हाँगकाँगमध्ये राहू लागल्या होत्या.. हाँगकाँगमधील इंग्रजी भाषकांचे प्रेम त्यांना लाभले, फेसबुकवर क्लेअर हॉलिंगवर्थ चाहतेमंडळ स्थापन झाले, या मंडळातर्फे गेल्याच १० ऑक्टोबरला त्यांचा १०५वा वाढदिवस साजरा झाला होता. जिवंतपणी मानवी मर्यादा ओलांडणाऱ्या, इतिहासाच्या ठसठसत्या नसांवर अचूक बोट ठेवणाऱ्या या पत्रकाराने मृत्यूचीही ‘डेडलाइन’ जणू थोपवून ठेवली होती.. अखेर ही डेडलाइन त्यांना पाळावी लागली. Click here to like our Facebook page. जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक पराक्रमी कुलदीपक जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द पाहणे माउली सईबाईंच्या नशिबी नव्हतेच मुळी! युवराज संभाजी अवघे २ वर्षांचे असताना त्यांनी कैलासाची वाट धरली. जन्मदात्या आईचे छत्र जरी हरवले असले तरी शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली युवराज संभाजी तयार होत होते. आपल्या पुत्राने स्वराज्याची गौरवपताका यशस्वीपणे पुढे न्यावी या हेतूने युवराज संभाजी लहान असल्यापासूनच शिवाजी महाराजांनी भावी छत्रपती म्हणून त्यांना घडवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाले की सोबत संभाजी राजांना आवर्जून नेत असतं. तसेच स्वत:हून सैन्याची लहानगी तुकडी पाठवून संभाजी राजांना त्या तुकडीचे नेतृत्व करायला सांगतं. शिवाजी महाराज राज्यकारभाराची प्रत्येक बाब त्यांच्या मनावर बिंबवत होते. त्याच दरम्यान संभाजी राजांना त्यांच्या जीवनातील सर्वात पहिल्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. औरंगजेबासोबतच्या आग्रा भेटीचा तो क्षण! महाराजांनी विश्वासाने औरंगजेबाचे आमंत्रण स्वीकारले. सोबत गेलेले संभाजी महाराज वयाने लहान असूनही न डगमगता धिटाईने औरंगजेबाला सामोरे गेले. तेव्हा औरंगजेबाला वाटलेही नसेल की हाच शिवपुत्र पुढे जाऊन आपल्याले जगणे असह्य करणार आहे. आग्र्यात बंदी असताना शत्रूच्या गोटात राहून संभाजी राजांना अनेक गोष्टी शिकता आल्या. पुढे आग्र्यातून निसटणे, वेषांतर करून दीर्घकाळ स्वराज्यापासून दूर राहणे, नानाविविध प्रदेशांचा आणि परिस्थितींचा अनुभव घेणे या सर्व घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि भावी छत्रपती म्हणून स्वराज्यासाठी हे सर्व कष्ट सहन करण्याला ते आपले कर्तव्य मानू लागले. १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ऍबे कँरे नामक एका फ्रेंच प्रवाश्याने संभाजी महाराजांचे केलेलं वर्णन त्यांच्यातील कुशल राज्यकर्त्याची पावती देण्यास पुरेसे आहे, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आस त्यांची मनात रुजू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी छोट्या परंतु अनेक यशस्वी मोहिमा हाताळल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्यावर आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीमध्ये रडत न बसता संभाजी राजांनी स्वत:ला सावरले आणि स्वराज्याचा डोलारा हाती घेतला. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. आता ते स्वत: छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल रयतेमध्ये पसरलेले गैरसमज दूर करून आपण देखील आपल्या पित्याप्रमाणे स्वराज्य अजून १०० वर्षे पुढे नेऊ शकतो हे त्यांना सिद्ध करायचे होते. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्वच बाबींमध्ये आपले कौशल्य दाखवून देत त्यांनी अल्पावधीतच रयतेचे आणि स्वराज्याचे मन जिंकून घेतले. संभाजी महाराजांना जाणून घेताना ते गादीवर बसल्यापासून पुढचा ९ वर्षांचा काळ हा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण हाच काळ संभाजी महाराजांना महापराक्रमी का म्हटले गेले आहे याचा प्रत्यय करून देण्यास पुरेसा आहे. केवळ २३ वर्षांचे संभाजी महाराज औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजंकडे होती महत्त्वकांक्षा! याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना पळो की सळो करून सोडले होते. गोव्यातील पोर्तुगीजां विरोधात जेव्हा त्यांनी मोहीम उघडली होती तेव्हा स्वत:हून खाडीमध्ये उतरुन त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले. कोकणातील रयतेची धर्माच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या धर्मांधांना संभाजी महाराजांनी जन्माची अद्दल घडवली. बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी रयतेला आपलेसे केले. प्रजा त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू लागली होती. लहान असताना ज्या औरंगजेबासमोर ते नाईलाजाने झुकले होते त्याच औरंगजेबाची झोप त्यांनी उडवली होती. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब संतापाला होता. संभाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी नाईलाजाने त्याला दक्षिणेत यावे लागले. पण त्याच्या मार्गातून हटतील ते संभाजी महाराज कुठले? ‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले. विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य! पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता, त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी! औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्याच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले. केवळ ३२ वर्षांचा त्यांचा हा जीवनप्रवास जगातील इतर जगज्जेत्यांसमोरही फिका वाटावा असाच आहे!! “संभाजी महाराजांनी काय केले?” असा प्रश्न जे विचारतात – खास त्यांच्यासाठी पुढील माहिती – संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये ५००० किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत ८०० मीटर लांबीचा पूल बांधला. आरमार वाढवून सागरालाही आपल्या कवेत घेतले. स्वराज्यात चार नवीन किल्ल्यांची भर घातली. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला. युध्द भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. स्वराज्याचा प्रथमच स्वतंत्र दारूगोळा कारखाना सुरु केला. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बाजारपेठा स्थापन केल्या. बाल मजुरी व बेटबिगारी विरूध्द कायदे तयार केले. संभाजी महाराजांनी आपल्या सर्व शिलेदारांना इतके जपले होते की त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकही बंडखोरी झाल्याची नोंद इतिहासामध्ये नाही. संभाजी महाराज जोवर हयात होते तोवर स्वराज्याची शान असणारा एकही किल्ला शत्रूच्या हाती गेला नाही…! त्यांनी सामारे २७ वर्षे औरंगजेबाला दक्षिणेत अडकवून ठेवले त्यामुळे उत्तरेकडे औरंगजेबाचे दुर्लक्ष झाले आणि तेथे इतर हिंदू सत्ता उदयास आल्या आणि उत्तरेतील हिंदू धर्म तरला. त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळले नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरवपताका फडकावली. संभाजी राजांच्या काळात स्वराज्य अधिक सुरक्षित राहील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलून दाखवला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा तो शब्दन शब्द खरा करून दाखवला. अवघ्या ९ वर्षांच्या कार्यकाळात एकही तह नाही की १२८ लढायांमध्ये एकही हार नाही अश्या या धर्माच्या अभिमानी, स्वराज्याच्या संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ! ३ मार्च १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांना उत्तरेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी चालून आली. १७५० च्या दशकामध्ये मराठ्यांनी उत्तरेकडील भागात अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यांनी थेट ‘अटके’पार मराठा साम्राज्य वाढविले. थोरले बाजीरावांची कारकीर्द संपेपर्यंत मराठ्यांनी एव्हाना भारतीय सीमा ओलांडत त्या पलीकडील इस्लामी राजवटींना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती. हे पाहून मराठ्यांचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे असे या राजवटींना वाटू लागले. १७५८ साली दिल्ली काबीज करत मराठ्यांनी अप्रत्यक्षरित्या अखंड भारत आपल्या कवेत घेतला. पंजाब आणि आसपासच्या प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या तिमूर शहा दुराणी याला देखील मराठ्यांनी पळवून लावले. हा तिमूर शहा दुराणी म्हणजे अहमदश अब्दालीचा थोरला पुत्र होय. ही घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरील संकट मानून चवताळलेल्या अब्दालीने आपल्या १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशाह अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता. याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून १ लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले. या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट येऊन मिळाल्याने मराठ्यांची ताकद शंभर पटींनी वाढली. या युतीने सर्वप्रथम दिल्लीवर आक्रमण केले. विश्वासरावांना दिल्लीच्या गादीवर बसवण्याचा भाऊंचा इरादा होता. पुरेशी रसद नसल्यामुळे त्यांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला आणि येथे अघटीत घडले. जाट आणि शिखांनी भाऊंचा हा देश अमान्य करीत आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात. अब्दाली आणि मराठ्यांमध्ये बारीक सारीक लढाया सुरु होत्या. कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी अब्दालीची बरीच सेना कापून काढली आणि उर्वरित सेनेला बंदी म्हणून ताब्यात घेतले. यामुळे चिडलेल्या अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली. अब्दालीने यमुना ओलंडताच मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला. पानिपत आणि सोनपत मधील संबलका येथे अब्दाली पोचताच मराठ्यांनी त्वेषाने अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविला पण इतक्यात अब्दालीची उर्वरित सेना दाखल झाली आणि मराठ्यांची ताकद कमी पडली. दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. या छोट्याश्या लढाईमध्ये अब्दालीला मराठ्यांची आणि मराठ्यांना अब्दालीची कुवत कळली. पण अब्दाली स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. त्याने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मरठी सैन्याची उपासमार होऊ लागली. पुढे दोन महिने दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करतच होते. पण अजूनही मोठ्या युद्धाला सुरुवात झाली नव्हती. दिवस सरत होते आणि मराठी सैन्यसही अन्न अपुरे पडू लागले. यावर उपाय म्हणून मराठ्यांनी स्थानिकांवर हल्ले करण्यास आणि लुटमार करण्यास सुरुवात केली. या पवित्र्यामुळे स्थानिकांचा मराठी फौजांवरचा रोष वाढीस लागला. इतक्या वेळ स्वस्थ बसलेल्या भाऊंनी अखेर स्वतहून पहिले पाउल उचलले. अन्नसाठा देखील जवळपास संपला होता. आता युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे प्रथम चालून गेला इब्राहीम खान! त्याने मराठ्यांच्या साथीने अफगाण आणि रोहिल्यांना सळो की पळो करून सोडले. भाऊंनी मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली. बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. त्यांनी अब्दालीची सेना पार धुळीला मिळवली होती. येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले. ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले. भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या. पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आहे. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली. जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली आणि यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही. कारण यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली. मुघल सत्ता तर आधीच खिळखिळी झाली होती आणि आता तर एकमेव मराठे साम्राज्य देखील घायाळ वाघाप्रमाणे निपचित पडून असल्याचे पाहून इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि १४ जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावत आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही. खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे, दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य! मराठा सैन्याने आपल्या मातीपासून १२००-१४०० किमी दूर अंतरावर जाऊन परकीयांविरोधात तेवढाच निकराने लढा दिला जेवढा त्यांनी इतर लढायांमध्ये दिला होता. पानिपताच्या रणांगणावर जर मराठा झेंडा रोवला गेला असता तर पुढचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी किती गौरवशाली असता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. लेखक अर्नाल्ड फ्लेचर हे त्यांच्या “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉनक्वेस्ट” या पुस्तकात म्हणतात, पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता. परंतु जणू कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि नशिबही! पण या पानिपताच्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे अहमदशाह अब्दालीला देखील मराठा साम्राज्याविरोधात जाणे चांगलेच महाग पडले होते, त्यामुळे पुन्हा कधीही अब्दालीने किंवा वायव्येकडील कोणत्याही साम्राज्याने भारतावर आक्रमण केले नाही. म्हणजे मराठी जरी पानिपतामध्ये हरले असले तरी त्यांनी मरता मरता त्यांनी जे शौर्य दाखवले त्याचे चीज झाले असे म्हटले तरी वावगे ठरू नये. गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात, कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती ! तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !! मराठ्यांच्या हिंमतीला एवढीच दाद देऊन चालणार नाही कारण युद्ध हरल्यावर बरचसे सैन्य जरी माघारी परतले असले तरी त्याहूनही जास्त सैन्य पानिपतामध्येच राहिले आणि आज पानिपत त्यांची कर्मभूमी झाली आहे. त्यांच्या वंशजांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते. आज २५० वर्षानंतरही ज्या भूमीत त्यांच्या पूर्वजांनी गुडघे टेकले त्याच भूमीत हे रोड मराठा समाजाचे आपले बांधव मराठी झेंडा अभिमानाने रोवून आपली छाप पडत आहेत आणि आजही पानिपतातील मराठी सैन्याच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवून आहेत. हे देखील वाचा : मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज ! राकेश शर्मा हे नाव ऐकल्यावर आपल्याला भारताचा तो पहिला व्यक्ती आठवतो ज्याने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यांच्या याच कामगिरीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली. जगाच्या इतिहासामध्ये स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल चला काही रंजक गोष्टी जाणून घेऊया! १३ जानेवारी १९४९ रोजी जन्मलेले राकेश शर्मा मुळचे पंजाबचे! पण त्यांनी आपलं शिक्षण हैद्राबाद येथून पूर्ण केलं.राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमी मधून पास झाल्यानंतर भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले. एक टेस्ट पायलट असल्याकारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉसमॉसस्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. या मोहिमेत त्यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी संशोधन केले. अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की अंतराळातून आपलं भारत कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मा म्हणाले, सारे जहॉं से अच्छा! त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. Click here to like our facebook Page तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल आणि प्राचीन काळातील राजे-राजवटींच्या काळातील गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चीन सारखा दुसरा इतिहास नाही. चीनचा इतिहास हा इतक्या विचित्र आणि विक्षिप्त गोष्टींनी भरलेला आहे की वाचताना चेहऱ्यावर केवळ कुतुहलाचेच भाव असतात. चीनच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलंय. त्यांची स्वत:ची अशी एक ओळख आहे. काही राजे शूर होते, काही प्रेमळ होते तर काही अगदीच वेडे आणि विक्षिप्त होते. चीनच्या इतिहासामधील असाच एक ठार वेडा सम्राट म्हणजे चीनचा सम्राट झेंगडे होय! सम्राट झेंगडे याचे मूळ नाव होते झु होझाओ! २६ ऑक्टोंबर १४९१ रोजी प्रसिद्ध मिंग साम्राज्यात त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांची संपूर्ण चीन साम्राज्यावर सत्ता होती. स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण चीन आपल्या कवेत घेतला होता. अश्या या शूर राज्याचा अकस्मात मृत्यू झाला आणि अवघ्या १४ वर्षांचा त्याचा मुलगा झु हा गादीवर बसला आणि चीनचा सम्राट झाला. झु हा काही लहानपणापासून विक्षिप्त नव्हता. तो सर्वच बाबतीत हुशार होता. विशेष करून धर्मशास्त्रामध्ये तो पारंगत होता. पण सत्त्तेची धुंदी भल्याभल्या विद्वानांना नादी लावते आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट करते हे काही उगाचचं म्हटले जात नाही. झु सोबत देखील तसेच काहीसे झाले. मदिरा आणी मदिराक्षी यांच्या सहवासात तो स्वत:चे सम्राटपद विसरून गेला. जनानखाण्यात त्याने इतक्या वेश्या ठेवल्या होत्या की हळूहळू जागा अपुरी पडू लागली. त्याला प्रत्येकीकडे जातीने लक्ष देता येईना. त्यामुळे अनेक जणींची उपासमार व्हायची. त्यामुळे काही जणींना मृत्यूने गाठले. एकदा तर जनानखान्याला भलीमोठी आग लागली. अनेक स्त्रिया त्यात गुदमरून मृत पावल्या. ही आग सम्राज्ञीच्या आदेशावरून लावली गेल्याचे बोलले जाते. परंतु सम्राट झेंगडेला या गोष्टींची काहीही फिकीर नव्हती. सम्राट झेंगडे हा जनानखान्यातून क्वचितच बाहेर यायचा. त्याचा दरबार हा जनानखान्यातच भरला जायचा असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तेथूनच तो प्रजेबद्दलचे आणि राज्याबद्दलचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा. निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करण्याच्या भानगडीत तो कधीही पडायचा नाही. कोणताही प्रश्न सेकंदात सोडवायचा आणि त्यावर निर्णय देण्यात त्याचा हातखंडा होता. अर्थातच बहुतांश निर्णयाचा त्याला फटका बसला परंतु काही निर्णय मात्र त्याच्या चांगलेच पथ्थावर पडले. सम्राट झेंगडे ला शिकारीचा देखील नाद होता. पण शिकार करण्यासाठी जंगलात जाणे त्याला कंटाळवाणे वाटे, म्हणून त्याने राजमहालातच अनेक श्वापदे आणून ठेवली होती. लहर आली की तो त्यांना पिंजऱ्याबाहेर सोडण्याचे आदेश द्यायचा आणि त्यांचा जीव घेऊन शिकार केल्याचा आनंद मिळवायचा. सम्राट झेंगडेच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नव्हतं. अचानक या सम्राटाला हिजड्यांबद्दल कळवला वाटू लागला. चीनमधीलच नाही तर विदेशातील हिजड्यांना देखील आपल्या साम्राज्यात येण्याचे आमंत्रण त्याने पाठवले आणि त्यांची एक फौज बनवून त्यांना आपल्या सेवेत ठेवून घेतले. त्याने आठ हिजड्यांची निवड केली आणि त्यांची एक सल्लागार समिती स्थापन केली. या आठ हिजड्यांना ‘एट टायगर्स’ म्हटले जायचे. त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे तो पालन करायचा. सम्राटाने त्यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देखील बहाल केला होता. या अधिकाराचा एट टायगर्सने बराच गैरफायदा घेतला, या गटाचा प्रमुख होता ‘लिऊ जीन’! सम्राट झेंगडेच्या अतिशय मर्जीतला माणूस म्हणून सगळे त्यांना घाबरून असायचे. हा लिऊ जीन वाटायचा तितका साधा नव्हता. सम्राट झेंगडेची हत्या करून आपल्या भावाच्या नातवाला गादीवर बसवायचे आणि संपूर्ण राज्य आपल्या हाती घ्यायचे असा कट त्याने रचला. पण एट टायगर्स पैकी कोणा एकाला लिऊ जीनचे हे कट कारस्थान कळले आणि त्याने थेट सम्राट झेंगडेला या कटाबद्दल सांगितले. हे ऐकून सम्राट झेंगडेची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने लिऊ जीनची चौकशी करण्याचे आदेश दिले. लिऊ जीनने घाबरून आपला गुन्हा कबूल केला. अर्थातच सम्राट झेंगडे हा काही मृदु मनाचा नव्हता, त्याने लिऊ जीनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. १५१० साली लिऊ जीनला प्रजेसमोर ठार मारण्यात आले. या घटनेनंतर तरी सम्राट झेंगडे सुधारेल अशी दरबारातील काही एकनिष्ठ लोकांना आशा होती. परंतु सम्राट झेंगडेचे स्वभावात काहीही बदल झाला नाही. त्याने विनाकारण सभोवतालच्या राज्यांववर आक्रमणे केली. सम्राट झेंगडेच्या या स्वभावामुळे त्याच्याबद्दल इतर साम्राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रजा देखील सम्राटाच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळली होती. अनागोंदीच्या या वातावरणाचा हिजड्यांच्या फौजांनी बराच फायदा घेतला. त्यांनी सम्राट झेंगडेचे साम्राज्य अगदी धुळीला मिळवून टाकले. मिंग साम्राज्य अस्ताच्या उंबरठ्यावर उभे होते. अचानक २० एप्रिल १५२१ रोजी सम्राट झेंगडे नाहीसा झाला. सगळीकडे त्याची शोधाशोध सुरु झाली. तेव्हा महाला जवळच्या एका तलावात त्याचे मृत शरीर आढळले. सम्राट झेंगडेची हत्या कोणी केली याचे सत्य शेवटपर्यंत गुलदस्त्यातचं राहिले. त्याच्या विश्वासातल्या हिजड्यांनीचं संपत्तीच्या लोभापायी त्याचा काटा काढला अशी कुजबुज सुरु होती. परंतु ठोस असे काही निष्पन्न होऊ शकले नाही. टायटॅनिक म्हटलं की आठवतं ते भलंमोठं प्रचंड जहाज आणि त्या जहाजाच्या अपघातावर आधारित चित्रपट! या चित्रपटामध्ये टायटॅनिकला नेमका अपघात कसा झाला आणि ते जहाज बुडालं कसं यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुळात तुम्हाला हे सर्व माहित असणारच, कारण टायटॅनिक चित्रपट न पाहण्रा माणूस मिळणे तसं कठीणच! तरी ज्यांनी पहिला नसेल त्यांना म्हणून सांगतो, जहाजाच्या भल्यामोठ्या आकारापुढे जशी मुंगी भासावी तश्या समुद्रातील लहानग्या हिमानागाला धडकल्यामुळे टायटॅनिक बुडलं! हे असंच संपूर्ण जगात मानलं जातं. पण ज्याप्रमाणे प्रत्येक ऐतिहासिक गोष्टींमध्ये वेगळ्या बाजूने तर्क लावणारा एक गट असतो तसाच एक गट टायटॅनिक जहाजाच्या या अपघात कहाणीला नाकारतो आणि वेगळा अर्थ लावतो. आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी हा गट त्यावर रिसर्च देखील करत होता आणि त्यातून त्यांना सापडलेला निष्कर्ष असे दर्शवतो की आपण आजवर जे हिमनगाचं कारण ऐकत आलोय ते अर्धसत्य आहे…! एप्रिल १९१२ रोजी एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना झालेल्या टायटॅनिकला जहाजाला अटलांटिक महासागरामध्येच जलसमाधी मिळाली होती. या ऐतिहासिक दुर्घटनेत १५०० पेक्षा जास्त लोकांना स्वत:चे प्राण गमवावे लागले होते. आगीमुळे जहाजाला नुकसान पोहोचलं त्यानंतर ते हिमनगाला ठोकल्यामुळे ते अजून कमजोर होऊन बुडालं. टायटॅनिकच्या अपघातावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार, टायटॅनिकमध्ये सर्वात प्रथम मागच्या बाजूला आग लागली होती. त्यामुळे ते जहाज कमजोर झाले होते. सुमारे तीन आठवड्यापर्यंत ही आग धुमसत होती. यावर कोणी लक्ष दिलं नाही. जहाजाच्या जा भागात आग लागली होती. तीच कमजोर बाजू हिमनगाला ठोकली आणि त्यामुळे जहाज बुडाले. जहाजात आग लागण्याचा हा निष्कर्ष जहाजामध्येच दिसलेल्या ३० फूट उंचीच्या मोठ्या काळ्या डागावरुन काढण्यात आला आहे. ज्या बाजुला जहाज हिमनगाला ठोकलं होतं त्याच जहाजाच्या मागच्या बाजुला हे काळे डाग दिसले. बॉयलर रूमच्या मागे असलेल्या इंधनाच्या स्टोरमध्ये ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. जहाजावरील १२ लोकांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आव्हान भरपूर उशीर झाला होता. ती आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेली होती. या आगीमुळे तापमान तब्बल १००० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जात आहे. संशोधकांच्या या निष्कर्षाचा सबळ पुरावा म्हणजे ज्या कंपनीने टायटॅनिक बनवली त्या कंपनीचे अध्यक्ष जे. ब्रूसने यांचे विधान होय! ते म्हणाले, जहाजवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जहाजामध्ये लागलेल्या आगीबाबत प्रवाश्यांना काहीही कळता कामा नये. Click here to Like our facebook page ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता “लिटल बॉय” आकाशातून हिरोशिमाच्या अंगावर झेपावला आणि हिरोशिमा सकट पूर्ण जगाला हादरा बसला! पाठोपाठ ९ ऑगस्ट रोजी “फॅट मॅन”ने जपानचं कंबरडं मोडून ठेवलं. आजवरच्या इतिहासात, युद्धात अणू बॉम्ब वापरले गेले ते सुदैवाने हे दोनच. काय असतो हो हा अणू बॉम्ब?! मोठ्ठा स्फोट होतो. म्हणजे नेमका किती मोठ्ठा?! त्याचा आवाका काय? प्रत्येक मूलद्रव्याच्या अणू केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 2 घटक असतात. त्यांची संख्या समान असेल तर तो अणू! तात्पर्याने ते मूलद्रव्य “स्टेबल” म्हणले जाते आणि जर ही संख्या समान नसेल तर ते मूलद्रव्य अस्थिर समजलं जातं. पर्यायाने किरणोत्सर्गी! उदाहरणार्थ युरेनियम किंवा प्लुटोनिअम. ही दोन मूलद्रव्ये अणूऊर्जा बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. अत्यंत कमी वस्तुमान उपयोगात आणून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. युरेनियमच्या एका अणू केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्यातले न्यूट्रॉन फुटून वेगळे होतात आणि ते फुटलेले न्यूट्रॉन इतर अणू केंद्रकांवर जाऊन आदळतात. ही चेन रीऍक्षन काही नॅनो-सेकंदात होऊन प्रचंड ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ह्या प्रक्रियेला न्यूक्लीअर फिशन म्हणतात. ढोबळ मानाने हे अणूबॉम्बचं तत्व! १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी(कसं ते) सांगू शकेल की कुठलंही अस्थिर मूलद्रव्य न्यूट्रॉनच्या स्वरूपात किरणोत्सर्ग होत असल्याने काळानुरूप स्थिर होत जातं. त्यामुळे आण्विक उपयोगासाठी युरेनियम किंवा प्लुटोनिअम मिळवणे अवघड असते. १६ जुलै १९४५ रोजी अमेरिकेने प्रोजेक्ट मॅनहॅटन अंतर्गत न्यू मेक्सिकोच्या जॉर्नादा डेल म्युएर्टोच्या वाळवंटात “ट्रिनिटी”चं परीक्षण केलं. मानवी इतिहासातली ही पहिली अणू चाचणी! पाठोपाठ ऑगस्टमध्ये जपानवर २ दणके घातले आणि रशिया पेटून उठला!! दुसरे महायुद्ध आटोपल्यावर अमेरिका आणि रशिया दरम्यान महासत्ता होण्याची शर्यत लागली आणि आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यामध्ये दुर्दैवाने ‘कोणाच्या बॉम्ब मध्ये किती दम’ हा क्राईटेरिया सामील झाला. कुठल्या बॉम्बची शक्ती किती हे मोजण्याची पद्धत म्हणजे, झालेला स्फोट घडवण्याकरता किती TNT(बारूद) उडवावे लागेल ही! ट्रिनिटी टेस्ट २० किलो टन शक्तीची होती. म्हणजेच २० हजार टन बारूद जाळल्याने जो स्फोट होईल तितकी.हिरोशिमाचा मुडदा पाडणारा “लिटल बॉय” होता १५ किलोटनचा आणि नागासाकीचा खूनी “फॅटमॅन” होता २१ किलोटनचा! एका सुतळी बॉम्बमध्ये 2-3 ग्राम बारूद असते..!! यानंतर रशियाने देखील अणूचाचण्या करायला सुरुवात केली. अमेरिकी आणि रशियन अणू स्पर्धा शिगेला पोचली असताना शेवटचा घाव रशियाने घातला. 30 ऑक्टोबर 1961 रोजी मित्युशीखा बेटांवर रशियाने लिटल बॉय आणि फॅट मॅनच्या बापाला जन्माला घातलं. बापाचं नाव ठेवलं ‘झार बॉम्बा’..अर्थात ‘राजा बॉम्ब’. ८ मीटर लांब आणि २.१ मीटरचा परीघ असणाऱ्या ह्या राक्षसाचं वजन होतं २७ हजार किलो! एका खास बनवलेल्या विमानातून ह्या बॉम्बला मित्युशीखाला नेण्यात आलं आणि ८०० किलो वजनाचे पॅराशूटबांधून सोडण्यात आलं. का? बॉम्ब खाली पडायला वेळ लागावा आणि विमानाला सुरक्षित अंतरावर जायला काही सेकंद मिळावेत म्हणून! बॉम्ब सोडल्याबरोब्बर विमान गिरकी घेऊन जिवाच्या अकांताने पूर्ण वेगाने दूर उडालं. पॅराशूटच्या सहाय्याने तरंगत “झार” जमिनीवरून २ किलोमीटर उंचीवर आला आणि कहर झाला! भयाण, अतर्क्य मोठा स्फोट घडून आला! ४ मैल रुंद आगीचा गोळा झळाळला जो २००० किलोमीटर दूरवरून बघता येऊ शकत होता! १०० किलोमीटर परिघातल्या सगळ्या सिमेंटच्या इमारती आणि इतर गोष्टी भुईसपाट झाल्या. शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लाकडी इमारती नष्ट झाल्या. दगडी बांधकामांचे दरवाजे खिडक्या उडाले. २७० किलोमीटर दूर बसलेल्या निरीक्षकांना खास गॉगल घालून देखील आंधळं व्हायची वेळ आली. १०० किलोमीटर दूर असणाऱ्या माणसाना थर्ड डिग्रीचे चटके जाणवले. तिकडे ९०० किलोमीटर लांब फिनलंड आणि नॉर्वे मधल्या घरांच्या काचा तडकल्या!! ७०० किलोमीटर पर्यंत “शॉक वेव्ह” नोंदवली गेली. बॉम्बमुळे तयार झालेल्या “मशरूम क्लाऊड” ची उंची होती ६४ किलोमीटर. माउंट एव्हरेस्टच्या ८ पट आणि रुंदी होती ९५ किलोमीटर….! झारची क्षमता होती ५० मेगा टन. ५००००किलोटन! अमेरिकेने चाचणी घेतलेला सर्वात मोठा अणू बॉम्ब “कॅसल ब्रावो” १५ मेगाटनचा होता. लिटल बॉय १५ किलोटनचा होता ज्यात ६७ किलो युरेनियम वापरलं गेलं होतं. पैकी १ किलो पेक्षा कमी युरेनियमचं फिशन झालं आणि काही ग्राम युरेनियमचं ऊर्जेत रूपांतर झालं. अंदाज बांधा! जगाच्या इतिहासात घडवून आणला गेलेला हा सर्वात मोठा आणि विध्वंसक विस्फोट! किती मोठा?! लिटल बॉय आणि फॅटमॅनच्या एकत्रित ऊर्जेच्या १५७० पट जास्त ऊर्जा निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या सगळ्या मिळून विस्फोटकांच्या दहापट जास्त ऊर्जा! आजवर जगात जितके अणुस्फोट झाले त्याच्या एक दशांश ऊर्जा…! ही गोष्ट १९६१ सालची आहे. ५५ वर्ष लोटलीत! आज काय तंत्रज्ञान आहे?! एखादा झार दिल्ली सारख्या शहरावर पडला तर भारताची, १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची २ टक्के लोकसंख्या क्षणात गायब होईल. २ टक्के!!! पुढची शेकडो वर्षे गवताचं पातं उगणार नाही ते वेगळंच! मुंग्या देखील मरत नसतील इतकी माणसे मरतील. दिल्लीचे मैदान बनेल. कुठल्याही शहराचे! मुंबई सोबत नाशिक-पुणे फुकटात भुईसपाट! दिल्लीसह गुरगाव-आग्रा-फरिदाबाद-सोनीपतचा देखील धुव्वा! ह्या सगळ्याचा उद्देश हाच की कशाची कल्पना नसणारे लोक जेंव्हा पाकिस्तानवर एक बॉम्ब हाणा किंवा २ आपल्यावर पडू द्या हरकत नाही वगैरे बोलतात तेंव्हा धडकी भरते!! अरे तेंव्हाचा परीघ हजार किलोमीटर होता..आताचा?! आणि हो, मुळात “झार”ला १०० मेगाटन शक्ती देण्याचे ठरले होते, त्याची घडण १०० मेगाटनची होती…!! जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह म्हणून आजही वर्षांनी हिटलरचेचं नाव घेतले जाते. त्यांच्या घोर क्रूर कृत्यांनी त्याला क्रूरकर्मा हिटलर अशी पदवी मिळवून दिली आणि जगाच्या काळ्या इतिहासात तो अजरामर झाला. त्याच्या महत्त्वकांक्षी पण गर्विष्ठ स्वभावामुळे त्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. हजारो लोकांच्या हत्येचा कलंक त्याच्या माथी लागला. त्याच्या याच पापांची शिक्षा त्याला मरतेवेळी मिळाली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जगातील एका कुप्रसिद्ध हुकुमशहावर स्वत:च्या हाताने गोळी झाडून आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय ! कोणासमोरही न झुकणाऱ्या हिटलरने त्या दिवशी स्वत:ला मृत्युच्या स्वाधीन केले. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा हिटलरला आपली घोडचूक लक्षात आली आणि जर्मनीचा घोर पराभव त्याला दृष्टीक्षेपात दिसू लागला तेव्हा त्याने ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली ही बाब संपूर्ण जगाला माहिती आहे. किंबहुना इतिहासचं तसा आहे, तो नाकारता येणार नाही. परंतु Simoni Renee Guerreiro Dias या लेखिकेने Hitler in Brazil – His Life and His Death या आपल्या पुस्तकामध्ये काही असे दावे केले आहेत जे हिटलरचा मृत्यच नाकारतात. तिच्या मते हिटलरने संपूर्ण जगाला चांगलेचं चकवले आहे. असा दावा पहिल्यांदाचं केला जात आहे असेही नाही, कारण यापूर्वी एका नाझी पत्रकाराने हिटलरचा मृत्य ब्राझीलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी झाला होता असा दावा करत खळबळ उडवून दिली होतती. सोबत पुरावा म्हणून त्याने हिटलर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं एक छायाचित्र देखील सादर केलं होतं आणि आता त्याच गोष्टीला पुढे नेत Simoni Renee या लेखिकेने त्याचे विधान सत्य होते असे जगजाहीर करून टाकले आहे. पुस्तकातील वर्णनानुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरने स्वत:वर गोळी झाडली नव्हती. तर तो तेथून निसटून थेट ब्राझीलला गेला आणि वयाच्या ९५ व्या वर्षी पर्यंत आपल्या गर्लफ्रेंड सोबत सुखाचे आयुष्य जगला. ब्राझीलमध्ये पलायन केल्यावर त्याने अॅडॉल्फ लिपजेग नाव धारण केले. तो ज्या भागात राहायचा त्या भागात देखील याच नावाचा मनुष्य राहत असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तेथील स्थानिकांना त्याच्याबद्दल एवढीच माहिती होती की तो जर्मनीचा रहिवासी आहे. Simoni Renee या लेखिकेने जवळपास २ वर्षे संशोधन करून हिटलरबद्दल हा दावा केला आहे. तिच्या मते हिटलर सर्वांच्या नजरा चुकवीत एका गुप्त मार्गाने अर्जेंटिनामध्ये पोचला. तेथे त्याची ब्राझीलमध्ये राहणाऱ्या कटिंगा नामक महिलेशी ओळख झाली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या पुस्तकामध्ये Simoni Renee हीने एक छायाचित्र देखील दिले आहे. परंतु ते खूपच धुरकट आहे. या छायाचित्रामधील महिला कटिंगा असून तिच्या सोबत उभा असणारा मनुष्य हिटलर आहे. Simoni Renee यांच्या मते हिटलरच्या खोलीमध्ये मिळालेले शव हे हिटलरचे नव्हते. तो कोणी दुसराच व्यक्ती होता. इथे हिटलरने दुसऱ्या एका व्यक्तीचा बळी देऊन स्वत:च्या आत्महत्येचा बनव रचला. Gerrard Williams या पत्रकार आणि इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार त्याच्याजवळ FBI ची अशी काही कागदपत्रे आहेत जी सिद्ध करतात की अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याच्या शोध घेत होती. म्हणजेच त्यांना देखील हिटलरच्या मृत्यूविषयी शंका होती. अजून एक मुख्य आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हिटलरच्या जिवंत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीने एक डीएनए टेस्ट करण्यात आली होती. त्या डीएनए टेस्टमध्ये हिटलरच्या कुटुंबियांचे डीएनए आणि ब्राझीलमध्ये राहत असलेल्या अॅडॉल्फ लिपजेग या व्यक्तीचे डीएनए मॅच झाले आणि हा या दाव्याला बळकटी देणारा सर्वात मोठा पुरावा ठरलायं की ब्राझीलमधील अॅडॉल्फ लिपजेग हाच अॅडॉल्फ हिटलर होता. Simoni Renee यांच्या या दाव्यावर जगभर उलटसुलट चर्चा सुरु आहे. अनेकजण हा दावा पोकळ असल्याचे सांगतात तर अनेक जणांनी तिने दाखवलेल्या पुराव्यामुळे या दाव्यावर विश्वास देखील ठेवला आहे. Simoni Renee हिच्या या खळबळजनक दाव्याला खोडून काढणारा एकच पुरावा होता तो म्हणजे Rochus Misch हा हिटलरचा बॉडीगार्ड ! याच बॉडीगार्डने सांगितले होते की “हिटलरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि तो टेबलावर पडला.” या बॉडीगार्डचा देखील गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वयाच्या ९६ व्या वर्षी मृत्यू झाला. हिटलरच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. ते लवकरच उकलले जाईल अशी आशा करूया ! रवींद्र कौशिक नाव त्याचं! राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात १९५२ साली त्याचा जन्म झाला. तरुण वयात येईपर्यंत त्याला नाटकाचं भयंकर वेड होतं. अभिनय त्याच्या नसानसात भिनला होता. परंतु एके दिवशी लखनऊ मध्ये प्रयोग सदर करताना RAW या भारताच्या गुप्तहेर संस्थेच्या नजरेत तो आला आणि त्याच्या अवघ्या जीवनालाचं कलाटणी मिळाली. त्याच्या उत्तम अभिनयाचा वापर आपल्या कामासाठी केला जाऊ शकतो याची RAW ला खात्री होती. राष्ट्रीय नाटक स्पर्धेवेळी रवींद्रची एका RAW अधिकाऱ्याशी झालेली ओळख ते रवींद्रने पदवी शिक्षण पूर्ण केल्यापर्यंतच्या काळात तो RAW च्या अधिकचं जवळ गेला. १९७५ मध्ये पदवीधर झाल्यावर रवींद्रने RAW मध्ये प्रवेश केला आणि रवींद्र कौशिक हा राजस्थानमधील लहानश्या गावातील एक तरुण RAW एजंट बनला. येथून त्याचा जो प्रवास सुरु झाला तो थक्क करण्यासारखा आहे. रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद हा भारताचा सर्वात विश्वसनीय आणि सर्वोत्तम स्पाय एजंट होता. सुमारे तीस वर्षे त्याला कामगिरीसाठी RAW ने प्रशिक्षण दिले होते. त्याची परतफेड म्हणून रवींद्रने पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश मिळवला. त्याचा कोणालाच संशय आला नाही, उलट त्याची क्षमता पाहून पाकिस्तान आर्मीने त्याला मेजर हे पद बहाल केले होते. इतकी हुबेहूब नक्कल वठवीत तो कित्येक वर्षे शत्रूच्या गोटात राहून देशाची सेवा करत होता. RAW मध्ये भरती झाल्यावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तो भूमिगत झाला. त्याच्या प्रशिक्षणा दरम्यान त्याने उर्दू भाषेचा अभ्यास केला. पाकिस्तान मधील लोकांची बोलण्याची लकब, त्यांच्या धार्मिक विधी, पाकिस्तानी आर्मीमधील पद्धती त्याने शिकून घेतल्या. जेव्हा १९७५ साली त्याला पाकिस्तानला पाठवण्यात आले, त्यापूर्वी भारतातील त्याची सर्व ओळख पुसून टाकण्यात आली. भारताचा नागरिक म्हणून त्याचाशी संबंधित जेवढी काही माहिती होती ती पूर्णत: नष्ट केली गेली. त्याला RAW ने एक नवीन ओळख दिली. आता तो झाला होता पाकिस्तानचा नागरिक नबी अहमद शाकीर! पाकिस्तानात गेल्यावर रवींद्रने सर्वप्रथम कराची विद्यापीठामधून कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याचं पदवीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश केला. तेथे त्याची कामगिरी पाहून त्याला मेजर पदावर बढती मिळाली. याच काळात त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करून तेथील अमानत नावाच्या एका स्थानिक मुलीशी लग्न देखील केले. कालांतराने त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १९७९ ते १९८३ या काळात तो अतिशय गुप्तपणे पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्याला यशस्वीपणे पोहोचवत होता. शत्रूच्या गोटात राहून स्वत:च्या जीवावर खेळत शत्रूची माहिती न चुकता पोचवणारे रवींद्र कौशिक त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संरक्षण खात्यामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांना सर्वजण ब्लॅक टायगर म्हणून ओळखत असतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे नाव त्यांना दिले होते. पण १९८३ मध्ये जणू त्यांच्या या धाडसीपणाला कोणाची तरी नजर लागली. १९८३ साली RAW तर्फे इनायत मसीहा नावाच्या अजून एका अंडरकव्हर एजंटला नबी अहमदला भेटण्यासाठी पाकिस्तानला धाडण्यात आले. पण दुर्दैवाने त्याची ओळख उघड झाली आणि तो पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागला. पाकिस्तानी सैन्याच्या निर्दयतेपुढे त्याने हात टेकले आणि त्याने नबी अहमद उर्फ रवींद्र कौशिकचे सत्य त्यांच्यासमोर उघड केले. रवींद्रला ताब्यात घेऊन जवळपास २ वर्षे त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने नाना अत्याचार केले. रवींद्रची दिवसरात्र चौकशी केली, परंतु त्याने देशाबद्दल एक अक्षरही न काढत त्या नरकयातना भोगल्या. तो काहीही सांगत नाही हे पाहून चवताळलेल्या पाकिस्तानने १९८५ साली त्याला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली, परंतु नंतर ही शिक्षा बदलून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यांना अटक झाल्यापासून भारत सरकारने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचे सांगत हात झटकले. शिक्षा सुनावल्यानंतर मियांवली, सियालकोट आणि न्यू सेन्ट्रल मुलतान अश्या विविध जेलमध्ये १६ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर २००१ साली टीबी आणि अस्थमाच्या आजरामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतरही भारत सरकारने त्यांचं शव घेण्यासही नकार दिला. भारताच्या नकारानंतर इस्लामीक विधीप्रमाणे पाकिस्तानातचं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही भारताचा हा सर्वोत्तम गुप्तहेर न्यू सेन्ट्रल मुलतान जेलच्या भिंतीआडील कबरीमध्ये शांत निद्रेत पहुडला आहे. कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी प्राणांचे बलिदान देणारा हा ब्लॅक टायगर आजही पाकिस्तानात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे. १७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले. आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले. आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत. पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते, युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे. हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका. हिंदूकुश. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर हिंदूकुश आडवा तिडवा पसरलाय. ऊंचच उंच ढगात गेलेला हा महाकाय पर्वत! हिंदूकुश हा ‘हिंद कोह’चा अपभ्रंश आहे. हिंद म्हणजे सिंधू नदी आणि कोह म्हणजे पर्वत. सिंधू नदीलगतचा पर्वत-हिंदूकुश! जुन्या पारशी भाषेत हिंदूकुशचा अर्थ “हिंदूंच्या मरणाची जागा” असा होतो म्हणतात. हिमालय नेहमी भारताला चिनी-मंगोल आक्रमकांपासून वाचवत आला. एखाद्या ढालीसारखा. मात्र हिंदुकुश कधीच ढाल बनू शकला नाही. ह्या पर्वत रंगांतली एक जागा भारतासाठी श्राप ठरली. खूप मोठा श्राप! खरं तर पूर्व आशियाला मध्य आशिया आणि आखाती प्रदेशांशी, युरोपशी जोडणारा हा रस्ता होता. प्रचंड मोठा व्यापार ह्या मार्गाने चालत असे. हा शापित मार्ग म्हणजे – खैबर खिंड! पाकिस्तान-अफगाण सीमेजवळ तोरखाम जवळचा हिंदूकुशच्या अजस्त्र रांगांतून जाणारा हा चिंचोळा मार्ग… महमूद गझनवी पासून अहमद शाह अब्दालीपर्यंत सगळे परकीय आक्रमक ह्याच रस्त्याने भारताचे लचके तोडून गेलेत. खैबर खिंड नसती तर आज चित्र काहीसं वेगळं नक्कीच असतं. सन 1398च्या हिवाळ्यात ही अपशकुनी जागा पुन्हा एकदा गजबजून गेली. आणखी एक लाखोंची एक क्रूर, धर्मवेडी रानटी फौज खैबर खिंड ओलांडत होती. ह्यावेळी दिल्लीची दौलत पाहून तैमूरलंग दिल्लीचा सत्यानाश करायला येत होता. मोहम्मद तुघलक मरून पाच दशके होत आली होती. दिल्लीच्या तख्तावर ह्यावेळी नसिरुद्दीन तुघलक विराजमान होता. खैबर खिंडीतुन हिंदूकुश पार केल्यावर 24 सप्टेंबर 1398 रोजी तैमूरच्या फौजांनी अटकेपाशी सिंधू ओलांडली. 30 सप्टेंबरला हे वादळ तुलांबा शहरात पोचलं. शहरातल्या सगळ्या रहिवाश्यांची कत्तल करुन संपत्ती लुटायला बरलास फौजांना फार वेळ लागलाच नाही. पाठोपाठ हीच अवस्था मुलतानची झाली. तुघलकाला कसलीच चिंता फिकीर नव्हती. तैमूरला दिल्लीपाशी पोचता पोचता जाटांचा प्रखर विरोध सोसावा लागला पण संख्येने निम्म्याहून कमी असणारे जाट लाखोंच्या त्या क्रूर बरलास फौजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. जाटांची खानदानेच्या खानदाने छाटली गेली. स्त्रियांवर बलात्कार झाले. तुघलकाने जाटांची कसलीही मदत केली नाही. दिल्लीला पोहोचेपर्यंत तैमूरने रस्त्यात असलेल्या प्रत्येक गावाची धूळधाण उडवली. असंख्य माणसे कापली, स्त्रिया कैद केल्या. नसिरुद्दीन तुघलक मात्र नाकर्तेपणाचा कळस रचत दिल्लीत सिंहासनावर ऐश करत बसला होता. तुलांबा, मुलतान ही शहरे उध्वस्त झाली. जहाँपनाह आणि सिरी ही गावे नेस्तनाबूत करून त्यातला प्रत्येक माणूस कापून काढण्यात आला. मेरठला मात्र तैमूरला खच्चून मार बसला. मेरठच्या गुर्जर राजा जोगराज सिंहाला नसिरुद्दीन तुघलकापेक्षा जास्त आपल्या प्रजेची चिंता होती. त्याने आधीच पूर्वतयारी केली. तैमूर मेरठला पोचला तसा संख्येने निम्म्या असणाऱ्या राजपूत, जाट आणि गुर्जर फौजा जीव खाऊन बरलास फौजांवर तुटून पडल्या. तुंबळ हाणामारी झाली. तैमूरच्या सैन्याने तुफान मार खाल्ला. आपण दिल्लीत काबीज करायला आलो आहोत, मेरठसारख्या लहान शहरांवर वेळ, पैसे आणि जीव खर्च नकोत करायला म्हणून तैमूरने मेरठचा नाद सोडला आणि तो रस्ता बदलून दिल्लीकडे निघाला. दिलेर जोगराज सिंहाने मेरठ वाचवले. अखेर डिसेंबर 1398मध्ये तैमूरने दिल्ली गाठली. दिल्ली येईपर्यंत तैमूरने एक लाख भारतीय कैद केले होते. आपली फौज तैमूरपेक्षा जास्त आहे, प्रदेश आपला आहे शिवाय आपल्याकडे लढाऊ हत्ती आहेत म्हणून महामूर्ख नसिरुद्दीन गाफील होता. हे ही खरंच. तातारी-बरलास फौजांना हत्ती फारसे माहित नव्हते. हे लोक हत्तीला वचकून असत. ह्यावर तैमूरने एक जबरदस्त उपाय योजला. दिल्लीजवळ पोचून सर्वात आधी त्याने कैद केलेले सर्व एक लाख कैदी कापून काढले. एक लाख माणूस एका दिवसात कापला गेला. हे क्रौर्य पाहून तुघलकी फौजांचे अर्धे अवसान गळाले. लढाऊ हत्तींवर भरोसा ठेवून गर्भगळीत झालेली तुघलक सेना रणात उतरली. 17 डिसेंबर 1398 रोजी मध्यआशियायी बरलास फौज तैमूरसारख्या अद्वितीय सेनापतीच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय उपखंडातली तुघलकी सेना हत्तीच्या भरवशावर एकमेकांना भिडल्या. सोंडेवर विषारी खिळे लावलेले शेकडो हत्ती बरलास फौजेवर चालून गेले. हत्ती हा प्राणी खूप लवकर भांबावून जातो ही माहिती तैमूरने काढून ठेवली होती. तैमूरने सोबतच्या शेकडो उंट आणि रेड्यांच्या पाठीवर मोठमोठे गवताचे भारे बांधले आणि पेटवले. असे हे उंट आणि रेडे भाल्याच्या टोचण्या देऊन हत्तींकडे पिटाळण्यात आले. शेकडो प्राणी पाठीवर आग घेऊन भयाण किंचाळत अंगावर येतायत हे पाहून तुघलकाचे हत्ती भांबावले, पिसाटले आणि मागे फिरून त्यांनी स्वतःच्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली…! असंख्य तुघलक सैनिक स्वतःच्याच हत्तींखाली चिरडून मेले. मौका साधून तैमूरची बरलास-तातार फौजेने तुघलकाची फौज उभी फाडून काढली. अटळ पराभव आणि तैमूरचे क्रौर्य पाहिलेला नसिरुद्दीन तुघलक काही माणसे आणि परिवार घेऊन राणांगणातून पळून गेला!! व्हायचं ते झालं…दिल्ली सताड उघडी पडली. धन-दौलत-संस्कृती-सोनं, रत्ने, धान्याने आणि समृद्धतेने ओसंडून वाहणारी दिल्ली तैमूरच्या निर्दयी पंजात आली. दिल्लीत घुसून तैमूरने तेच केलं जे तो करायला आला होता. तिकडे लांब समरकंदमध्ये त्याला दिल्लीच्या संपत्तीची खुशबू जाणवली होती. शिवाय हिंदुस्तान हा काफिर प्रदेश. दिल्लीचे तुघलक मुसलमान असले तरी ते ह्या काफ़िराना जिवंत कसे सोडतात? धर्मांतर का करून घेत नाहीत? कापून का टाकत नाहीत? लवकरात लवकर हिंदुस्तानात जाऊन तुघलकासारख्या नाकर्त्या सुलतानाला हटवून तिथे एक मजबूत आणि खरी खुरी रियासात कायम व्हायला हवी, हिंदूस्तानातले काफिर एकतर अल्लाहला शरण आले पाहिजेत किंवा खतम झाले पाहिजेत हा उद्देश्य ठेवून तैमूरने दिल्लीवर स्वारी केली होती! 15 दिवस ती रानटी तातारी फौज दिल्लीच्या रस्त्यावर क्रौर्याचा आविष्कार करत नंगा नाच करत राहिली! हजारो माणसे मारली गेली. प्रत्येक स्त्री एकतर मारली तरी गेली नाहीतर तिच्यावर बलात्कार, तो ही अनेकवेळा झाला. लहान मुले, वृद्ध देखील सोडण्यात आले नाहीत. प्रत्येक घर लुटून काढण्यात आले. तैमूरला न मानणाऱ्या, क्रौर्य नं पाहवणाऱ्या खुद्दार मुस्लिम सरदार आणि सैनिकांना देखील मुस्लिम असून सोलून काढण्यात आले. दिल्लीच्या रस्त्यांवर मारल्या गेलेल्या लोकांच्या मुंडक्यांची जागोजागी आरास करण्यात आली. दिल्लीवर इतका क्रूर हल्ला ह्याआधी कधीही झाला नव्हता, ना पुढे कधी झाला. अंदाजे दोन ते तीन लाख माणूस मेला. तैमूरचं समाधान होऊस्तोर दिल्ली लुटून चाटून पुसून काढण्यात आली. ही कत्तल इतकी भयंकर होती की कित्येक दिवस दिल्लीत कुजत पडलेल्या लाखो प्रेतांमुळे आजूबाजूच्या लहान वस्त्यांत रोगराई पसरली. दिल्लीत क्वचित माणूस रस्त्यांवर बाहेर जायला धजावे. 1399च्या सुरुवातीला खिजर खानाला सत्ता देऊन तैमूरने दिल्ली सोडली! जाताना तो हजारो गुलाम, सोनं-हिरे-मोती-जवाहिर लादलेले शेकडो हत्ती घेऊन गेला. तैमूरलंगचा आयुष्यातला हा सर्वात मोठा विजय होता! आणि भारताला झालेली सर्वात क्रूर जखम. अय्याश आणि मूर्ख नसिरुद्दीन तुघलकाच्या नाकर्तेपणाची किंमत हिंदूस्तानाला दिल्लीचा गळा चिरून चुकवावी लागली! तैमूरचं अस्तित्व भारतात ह्या हल्ल्यापुरतं नव्हतं! तैमूर नंतर त्याचंच रक्त पुन्हा दिल्लीवर चाल करून आलं आणि ह्या हल्ल्यानंतर 127 वर्षांनी तीमुरच्या खानदानाने दिल्लीवर भारतीय इतिहासातली सर्वात प्रसिद्ध मजबूत सत्ता प्रस्थापित केली. तैमूरच्या सख्ख्या नातवाचा पणतू म्हणजेच आपल्याला माहित असणारा झहिरुद्दीन मोहम्मद बाबर! पहिला मुघल सुलतान. तैमूरच्या मिरान शाह ह्या मुलाची पाचवी पिढी! गम्मत म्हणजे तैमूरने ज्याला सत्ता दिली त्या खिजर खानाच्या वंशजांनी हि सत्ता बहलोल लोधीला स्वेच्छेने सोपवली आणि बहलोल लोधीचा नातू इब्राहिम लोधीला पुन्हा तैमूरच्या वंशजाकडून पहिल्या पानीपत युद्धात पराभव स्वीकारावा लागला! अमीर तैमूर स्वतःला “इस्लामची तलवार” म्हणवून घेत असला तरी त्याने पर्शियामध्ये मुसलमानांची अशीच कत्तल घडवून आणली. तुर्कीचा महापराक्रमी सुलतान बय्यझीद यल्दरम ज्याने स्पेनपर्यंत मजल मारून युरोपीय ख्रिश्चनांना जेरीला आणलं होतं त्याचाही तैमूरने सत्यानाश केला! अमीर तैमूरच्या क्रौर्याबद्दल, त्याच्या चाणाक्ष सैन्यनीतीबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल थोडी अजून माहिती पुढच्या लेखात. AuthorMarathi Pizza दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे तो मेंढपाळ माळरानावर मेंढ्या चरायला घेऊन आला होता. मेंढ्या चरतायत तोवर मजेने इकडे तिकडे पाहात असताना एकदम त्याला कसलीतरी हालचाल जाणवली. पाहिलं तर झुडुपाआड एक पोरगा हळूच त्याची मेंढी चोरून न्यायला पाहत होता. मेंढपाळाचं डोस्कं सणकलं! ह्यापूर्वीही त्याच्या चार दोन मेंढ्या कोणीतरी पाळवल्या होत्या. लांडग्याने धरून नेल्या असाव्यात असा समज करून घेतलेल्या मेंढपाळाला आज मात्र चोर दिसला! संतापाने तिरिमिरीत त्याने खांद्यावरचं धनुष्य काढून पोरावर निशाणा धरला! पोराला चाहूल लागली तसा तो पळायला लागला पण मेंढपाळाने बाण सोडलाच! बाण येऊन पोराच्या मांडी आणि कंबरेच्या सांध्यावर बसला…लंगडत लंगडत पोरगा पळून गेला. === बाराव्या शतकात चंगेज खानने मध्य आशियातल्या राजवटींची पळता भुई थोडी केली. चंगेजच्या पश्चात त्याच्या मुलांनी आणि नातवांनी अजूनच गोंधळ घातला. मध्य आशिया जवळपास सगळाच बळकावला. मंगोल धर्मवेडे नव्हते. त्यांनी आपला धर्म किंवा संस्कृती कुठे कोणावर लादली नाही. ते जिथे जातील तिथल्या संस्कृतीत विरघळत गेले. मध्य आशियात तेंव्हा इस्लाम जबरदस्त जोमात होता त्यामुळे तिथे तळ ठोकून असणाऱ्या मंगोलानी इस्लाम जवळ केला. तिथल्या स्त्रियांशी लग्ने वगैरे प्रकार रुळत गेले. चंगेजचा मूळ ‘बोर्जीगीन’ वंश आणि तुर्की स्त्रिया ह्यांच्यातून एका नवा वंश तयार झाला. त्याला म्हणत “बरलास”. बरलास अर्धे मंगोल असले तरी धर्माने मुस्लिम होते आणि तुर्की भाषा बोलायचे. चंगेज खानाने मोहम्मद अलाद्दीन शाहची तुर्की-उझबेगिस्तान-कजाखस्तानमधली ख्वारेझमी राजवट धुळीत गाडल्यावर तिथे चगताई ह्या चंगेजच्या मुलाने सूत्रे सांभाळली होती. पुढे चगताईच्या वंशजांनी तुर्की इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्या भागात बेमालूम मिसळून गेले. बरलास वंश उदयाला आला. बरलास वंशाचा एक ‘तारकाई” म्हणून बऱ्यापैकी मोठा माणूस होता. समरकंदच्या दक्षिणेला असणाऱ्या केश नावाच्या गावात त्याचा मान होता. एकदा एका दुसऱ्या मंगोल टोळीने केशवर हल्ला केला. त्यात बरेच लोक कैद करून ते समरकंदला घेऊन गेले. त्यात ताराकाईची बायको आणि मुले देखील होती. त्याचा मुलगा कसाबसा कैदेतून निसटला आणि त्याने स्वतःची एक लहानशी टोळी तयार केली. हा पोरगा जंगलात, माळरानावर दबा धरून बसे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वा टसरूना लुबाडत असे. एकदा असाच हा पोरगा एका मेंढपाळाची मेंढी चोरायला गेला आणि तैमूरचा तैमूर-ए-लंग झाला ! तैमूरचा जन्म 9 एप्रिल 1434ला केश जवळ झाला. तैमूरचा खरा तुर्की उच्चार ‘देमीर’ असा होतो. काळाच्या ओघात देमिरचा तीमुर आणि तीमुरचा तैमूर झाला. एक पाय लंगडा झाला म्हणून तैमूरलंग. पाश्चात्य लोक त्याकाळी तैमूरलंगला टॅमर म्हणायचे. लंगडा झाला म्हणून टॅमर-द लेम. आज अपभ्रंश होऊन युरोप-अमेरिकेत तैमूरलंग हा “टॅमरलेन” ह्या नावाने ओळखला जातो. तैमूरचा शब्दशः अर्थ लोखंड/पोलाद असा होतो. आणि हे नाव मूळ ‘तीमुजीन’ ह्या मंगोल नावावर आधारलेलं आहे. तीमुजीन म्हणजे सुद्धा लोखंड. आणि तीमुजीन कोणाचं नाव होतं? “चंगेज खान”चं! मध्य आशियात पर्शिया-तुर्कमेनिस्तान-उझबेगिस्तान भागाला अरब मुस्लिम ‘मावार अन् नहर’ म्हणत. म्हणजे अमू दरीया (तुर्कमणिस्तानातील नदी) च्या पलीकडचा प्रदेश. आज ह्या भागाला transoxiana म्हणतात. समरकंद आणि केश ह्या प्रदेशात येतात. तैमूर लहान असताना ह्या भागावर मंगोलांची सत्ता होती. तैमूर 10 वर्षांचा असताना तिथे बंड पुकारलं गेलं आणि एक काजगन नावाचा ‘अमीर’ सत्तेत आला. अमीर म्हणजे योद्धा…जेता. तैमूर विशीच्या आसपास आल्यानंतर काजगनचा खून झाला आणि मंगोल पुन्हा सत्तेत परतले. तोपर्यंत तैमूरने टोळी बनवून बऱ्यापैकी नाव कमावलं होतं. वेळेची नजाकत साधून तैमूर मंगोलाना शरण गेला आणि त्यांचा मदतनीस म्हणून काम पाहू लागला आणि tansoxiana प्रदेशाचा शासक इलियास खोजाचा मंत्री बनला. पुढे तैमूरने बल्ख शहरातल्या हुसेनसोबत दोस्ती केली. हा हुसेन देखील सैन्य बाळगून असणारा मोठा योद्धा होता. अमीर काजगनचा नातू असणाऱ्या हुसेनसोबत हातमिळवणी करून तैमूरने इलियास खोजाविरुद्ध युद्ध पुकारलं. इलियास खोजा सुरुवतीची लढाई हरून प्रदेश सोडून पळाला असला तरी त्याने पुन्हा हल्ले करून तैमूर आणि हुसेनला पळवून लावलं. खोजाने पुन्हा समारकंदचा ताबा घेतला. तैमूर खोरासानला तर हुसेन बल्खला परतला. समरकंदमध्ये जवळपास लोक मुस्लिम होते. त्यांनी इलियास खोजा विरुद्ध बंड पुकारले. त्यात सरबेदर नावाच्या बंडखोरांनी इलियास खोजाला पळवून समरकंदमध्ये इस्लामिक राजवट निर्माण केली. तैमूरने सुरुवातीला सरबेदर लोकांशी मैत्री केली आणि पुढे ताकद वाढल्यानंतर हुसेनसोबत मिळून मारून समरकंद ताब्यात घेतलं. तैमूर समरकंदचा तर हुसेन बल्ख आणि इतर प्रदेशाचा ‘अमीर’ बनला. हुसेनच्या बहिणीशी त्याने लग्न केलं. तैमूर आणि हुसेनच्या स्वभावात खूप फरक होता. तैमूर लोकांकडून फारसा कर वसूल करत नसे. तो व्यापाऱ्यांना संरक्षण देई. गरीब लोकांची स्वतःच्या पैशातून मदत करत असे. माणसे जोडत असे. ह्यामागे त्याची दूरदृष्टी होती. आपल्याला जर विदेश जिंकायचा असेल तर आधी देशात मजबूत पाठिंबा हवा हा डोळसपणा होता. हुसेन अगदी विरुद्ध होता. Transoxiana प्रांतात आता तैमूरचा बोलबाला व्हायला लागला. लोक त्याला मानायला लागले. त्याचा दबदबा आणि रुतबा दिवसेंदिवस वाढू लागला. हे हुसेनला सहन होईना! दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. सुरुवातीचा बेबनाव आता तीव्र स्वरूप घ्यायला लागला. तैमूरच्या बायकोच्या मृत्यूनंतर दोघा मित्रातली कडीच तुटली आणि दोघेही सैन्यासकट एकमेकांसमोर उभे ठाकले.
प्रांतातले अनेक सरदार आणि मोठे लोक तैमूरच्या बाजूने होते. एकेकाळी तैमूरसारखे 50 सरदार पगारी ठेवणाऱ्या हुसेनचा सहज पराभव झाला! किकरसाव ह्या तैमूरच्या सरदाराने हुसेनला बेड्यात बांधून तैमूरसमोर हजार केलं. किकरसावचा भाऊ हुसेनकडून मारला गेला होता त्यामुळे त्याचा हुसेनवर प्रचंड राग होता. बेडीत जखडलेल्या हुसेनला पाहून तैमूर विरघळला! हुसेनने कठीणकाळी केलेली मदत आठवून आणि मित्र म्हणून तैमूरने त्याला माफ केले आणि मक्केला निघून जाण्यास सांगितले. पण मक्केच्या प्रवासाला निघालेल्या हुसेनला किकरसावने रस्त्यात गाठून मारून टाकले! 1470, वयाच्या चौतीसाव्या वर्षी तैमूर ‘अमीर तैमूर’ म्हणवला जाऊ लागला. चगताई राजवट असलेल्या ‘मावार अन् नहर’चा पेशवा असणाऱ्या तैमूरने पुढे चगताई राजवट उधळून तिमूरी राजवट कायम केली! स्वतःला चंगेज खानाचा वंशज आणि इस्लामची तलवार म्हणवणाऱ्या, चंगेज खान नंतर आशिया खंडातले सर्वात मोठे साम्राज्य बनवणाऱ्या, अनेक महाक्रूर कर्म करून बदनाम झालेल्या अमीर तैमूरलंग बद्दल अजून पुढची माहिती पुढील भागात! बऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्याबद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा, सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात की आजच्या प्रगत विज्ञानामध्ये त्याचाही मोठा वाटा आहे. तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता, पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे. आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार ज्यांचे पेटंट घेतलेले नाही, अश्या ह्या शास्त्रज्ञाविषयी, त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया ! निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (सध्याचं क्रोएशिया ) मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी निकोला हे चौथे अपत्य ! लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं. अद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सन १८७३ मध्ये चार वर्षाचे शिक्षण ३ वर्षांतच संपवले होते. पुढे १८७५ ला पॉलीटेक्नीकच्या द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते नापास झाले, त्यातच त्यांना जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही आणि ते फायनल परीक्षेत नापास झाले. त्यामुळे त्यांचे युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले. पुढे ते १८८१ मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बुडापेस्टमधील एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही. पुढे ते १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम ते करू लागले . पुढे १८८४ साली तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क (अमेरिका) मध्ये झाली. या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. एडिसन यांनी टेस्लाला त्यांचा डायरेक्ट करंट जनरेटर (DC Generator ) जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ देखील दिली नाही तेव्हा रागाने टेस्ला यांनी एडिसनची कंपनी सोडली. एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची Tesla Electric Light and Manufacturing नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्या Investors सोबतही त्यांचे काही पटले नाही. त्यांनी टेस्लाला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हलाखीची गेली. १८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली. इथं ते मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू लागले, एडिसन ने AC Current चे भय उत्पन्न करण्यासाठी चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला आणि AC ची शक्ती किती विनाशकारी याचं प्रात्यक्षिक लोकांना दाखवल. परंतु AC Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होते. DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला. त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरणेच बनवत होती, त्यामुळे एडिसनने या नवीन पद्धतीला विरोध केला. टेस्लाने उद्योगपती जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबावरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे. टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे AC Electric Motor होय. त्यांनी ह्या मोटारच्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला. १८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. Hollywood मधील The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत. ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला. असे मानले जाते की टेस्ला यांनी १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष-किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ साली त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले. ह्यामागे एडिसनचा हात होता असे देखील काहींचे म्हणणे आहे. Radio Wave शोध: टेस्ला ने रेडियो तरंगाचे (Radio Wave) ट्रान्समिशन करता येते, ह्या थेअरीज १८९३ मध्येच मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉडचा शोध त्यांनीच लावलेला आहे. ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले. हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता. लोकांना वाटायचे ही जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोटी मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे. पण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं. कोर्टात खुप काळ खटला चालला, पण पेटंट अखेर मार्कोनी यांना मिळाले. सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे. १८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम वीज निर्मिती सुद्धा केली. एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली. त्या विजेची गडगडाट एवढा मोठा होता की २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता. ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांनी पुढे हा पण दावा केला की Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभ्या केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे की त्यांच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्सनी धाडले होते. ज्या कामासाठी इन्वेस्टर्सनी पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला यांनी दुसरेच शोध लावले होते त्यामुळे सर्व इन्वेस्टर्सनी त्यांची लॅब बंद पाडली. १९०६ ला ५०व्या वाढदिवसाला त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी कोलोराडो धबधब्यात पॉवर स्टेशन बसवले. १९१२ मध्ये ब्रेनला इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी मांडल्या, त्यावर काही प्रयोग देखील केले.१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी ‘इलेक्ट्रिक रे’ ही प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण याबाबतीत त्यांचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरले. टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होत. त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३०० किलोमीटर दूर बॉर्डरवरून हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे की त्यामुळे शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होईल. संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेलमध्ये जीवन जगणाऱ्या ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता. त्यांच्या मृत्यू नंतर अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले. आज ही काही जण असे देखील मानतात की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकारनने लुप्त केले आहेत. निकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने त्यांच्या ७५ व्या Birthday निमित्त आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्यांच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना झाली.
चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे. सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे. सर्बियाच्या विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे. त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे. पाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे मोठाच शोध होता. अर्थात, त्यांच्यासाठी जरी तो “शोध” असेल तर आपल्यासाठी हे कित्येक हजार वर्षांपासून आपलं घरच होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘शोध’ असला तरी आपल्यासाठी फक्त ‘आणखी एक पाहुणा’ एवढंच ह्याचं महत्व. असो, मुद्दा हा की आपण सर्वांनीच शाळेत “भारताला कुणी शोधलं?” ह्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात “वास्को दा गामा” असं दिलंय. आपण इतिहासात तेच शिकलोय. सन १४९७ मध्ये जेव्हा वास्को दा गामा भारतात आला तेव्हा “भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन” म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली. पण त्याला भारताचा सागरी मार्ग दाखवणारा एक भारतीय व्यापारीच होता – ही नोंद इतिहासाने फारशी ठळकपणे घेतली नाहीये. हे आश्चर्यकारक आहे कारण – स्वतः वास्कोच्या रोजनिशीमधेच ही नोंद आहे…! प्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वास्को दा गामाची रोजीनिशी वाचली तेव्हा त्यांना ही नोंद वाचून सुखद धक्काच बसला. आपल्या रोजनिशीमध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताचा शोध का घ्यावासा वाटला, त्याची तयारी कशी केली आणि प्रवास प्रयाण कसं झालं…ह्या सगळ्या नोंदी वास्कोने करून ठेवल्या आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड जहाज बघून वास्को आश्चर्यचकित झाला. चौकशी करण्यासाठी आपल्या नोकराला त्याने ह्या भल्या मोठ्या जहाजावर पाठवलं. परतल्यावर नोकराने ‘हे भारतीय व्यापाऱ्याचं जहाज आहे’ हे सांगितलं आणि हरखून जाऊन वास्को स्वतः त्या जहाजावर गेल्या. “मला भारत शोधायचा आहे” असं म्हटल्यावर गडगडाटी हास्य करत तो ढेरपोट्या व्यापारी म्हणाला : अरे, तू काय भारत शोधणार? आमच्या अनेक पिढ्या मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये. वास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं ! अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रसिद्ध गुजराती व्यापारी कांजी मलम हाच वास्को दा गामाचा सागरी वाटाड्या होता. वास्कोला आफ्रिकेच्या मालंदी बंदरापासून कालिकत (कोझिकोडे, केरळ) बंदरावर कांजी मलमनेचं आणलं असं म्हटलं जातं. असो – कांजी मलम की आणखी कुणी – डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांच्यानुसार वास्कोला भारतात आणणारा भारतीय व्यापारीच होता, हे मात्र नक्की ! १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा हत्या करण्याचा प्रयत्न होता. परंतु अतिरेक्यांचे फुसके मनसुबे आपल्या वीर जवानांनी पार धुळीस मिळवून टाकले आणि भारताची शान असणाऱ्या संसदेची लाज राखली. परंतु जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर दहशतवाद्यांनी केलेल्या या आघाताची सल अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत आहे. विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आठवणी संसदेला पाहिल्यास आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात…. १३ डिसेंबर २००१ चा तो दिवस नेहमी सारखाच सुरु झाला. भारतीय संसदेच्या भोवताली रोज असायची तशीच परिस्थिती होती. संसदेचं कामकाजही एव्हाना सुरु झालं होतं. प्रत्येक चेहरा आपापल्या कामात व्यस्त झाला. अधिवेशन सुरु असल्याकारणाने मंत्री, खासदार आणि इतर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ति संसदेमध्ये उपस्थित होत्या. घड्याळ ११ वाजून ४० मिनिटांची वेळ दाखवत होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. गाडीवर गृहमंत्रालय आणि संसदेच स्टीकर लावलेलं असल्याने कोणत्याही अडथळ्याला तोंड न देता कार वेगाने आत शिरली. जेव्हा कार आता आली आणि थांबली तेव्हा कारमध्ये बसलेल्या एका दहशतवाद्याने बाहेर येत स्वत:ला हॅण्ड ग्रेनेडसह उडवून दिले. अचानक झालेल्या त्याच्या जबरदस्त स्फोटामुळे क्षणभर संपूर्ण वातवरण भांबावले. नक्की काय झालंय याची कुणालाही कल्पना येत नव्हती. जो तो स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्याच क्षणाला कारमध्ये बसलेल्या इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि प्रत्येकाची पळापळ सुरु झाली. हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेबाहेर पडले होते, परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजनांसमवेत १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि इतर भागात उपस्थित होते. या गोष्टीची जाणीव होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केले आणि खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याच्या दहशतवाद्यांच्या योजनेला सुरुंग लावला. कारमध्ये एकूण ६ दहशतवादी होते. त्यापैकी एकाने आत्मघातकी स्फोट घडवत स्वत:चा जीव दिला, तर इतर ५ जणांसोबत कडवी झुंज देत सुरक्षा जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांना कंठस्नान घातले. अर्ध्या तास चालेल्या या थरारनाट्यात ५ जवानांनी प्राणांचे बलिदान दिले, तर ९ जणांना दहशतवाद्यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात स्वत:चा प्राण गमवावा लागला. |
Author
|